शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्र्यांच्या 'मी पुन्हा येईन' घोषणेवर उद्धव ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 15:30 IST

Maharashtra Election Result 2019: उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला

औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात 'मी पुन्हा येईन' कविता सादर केली होती. त्यानंतरच्या अनेक सभांमध्येही फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन' असं म्हणत आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमध्ये टोला लगावला. उद्धव ठाकरेंनी आज अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना संबोधित केलं. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झाल्याचं ते म्हणाले. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीए. पाऊस जाताना 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' म्हणतोय. यामुळे लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे, असं ठाकरे म्हणाले. राज्यातील सत्तेचा तिढा केव्हा सुटेल, यावर थेट भाष्य करणं त्यांनी टाळलं. शेतकऱ्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत आपण सत्ता स्थापनेचा विचार करणार असू तर आपण निर्घृण आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.मला शेतीतलं फारसं कळत नाही. पण काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत अतिशय अपुरी असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. 'शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत द्या. यातून तो पुढच्या हंगामाची तयारी करू शकेल. शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक बाबींचा फारसा विचार करू नका. बळीराजाला माणुसकीच्या नात्यानं मदत करा आणि मग निकषांच्या फुटपट्ट्या लावा,' असंदेखील ते पुढे म्हणाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा. यासाठी प्रशासनानं कागदी घोडे नाचवू नयेत, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा