शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उदयनराजे होण्याच्या भीतीनं एकही आमदार फुटणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 13:23 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्यानं राज्यात घोडेबाजाराची शक्यता

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरल्यानं भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेची आक्रमक भूमिका कायम राहिल्यास भाजपाकडून इतर मार्गांचा वापर करून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसं झाल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होऊ शकतो. भाजपाकडून इतर पक्षांचे आमदार फोडले जाऊ शकतात, अशीदखील चर्चा आहे. यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटवरून भाष्य केलं आहे. 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालामुळे, उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही... लोकशाहीचा विजय असो!', असं तांबेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जनतेची भावना भाजपाचं सरकार येऊ नये हीच आहे, असंदेखील तांबेंनी पुढे लिहिलं आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. मात्र भाजपाचे 105 उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपाचं संख्याबळ 118 ते 120 च्या घरात पोहोचलं आहे. मात्र तरीही भाजपा बहुमताच्या जवळ जात नाही. शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा न झाल्यास सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी भाजपाला विश्वासदर्शक ठरावा जिंकावा लागेल. यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच पत्रकार परिषदेत याबद्दलचा आरोप केला जात होता. भाजपाकडून आमदारांवर दबाव आणला जात आहे. गुंडगिरीसह अन्य मार्गांचा वापर भाजपाकडून केला जात आहे. भाजपासारखं राजकारण गुंडांनीदेखील केलं नसेल, अशा कठोर शब्दांत राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं होतं. आमदारांच्या फोडोफोडीच्या शक्यतेवर भाष्य करताना सत्यजित तांबेंनी भाजपाचे नेते उदयनराजे भोसलेंच्या पराभवाचा संदर्भ दिला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या उदयनराजेंनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSatyajit Tambeसत्यजित तांबे