शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'काय फिफ्टी-फिफ्टी लावलंय? सत्ता म्हणजे बिस्कीट आहे का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 9:09 AM

Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलावरून रस्सीखेच सुरुच

मुंबई: विधानसभेच्या निकालाला नऊ दिवस होऊन गेले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा काही सुटताना दिसत नाही. नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका, चर्चा जोरात सुरू आहेत. मात्र तरीही सत्ता स्थापनेचा पेच काही सुटलेला नाही. विशेष म्हणजे राज्यातील मतदारांनी महायुतीला अगदी स्पष्ट कौल दिलेला असतानाही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. शिवसेनेनं वारंवार 50-50 चा आग्रह धरला आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपामध्ये सत्ता स्थापनेबद्दल चर्चादेखील होताना दिसत नाही. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी शिवसेनेला टोला लगावला आहे. सत्तापदांचं समान वाटप व्हावं अशी मागणी करत शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं अशी आग्रही भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. त्यावरून ओवेसींनी शिवसेनेला चिमटा काढला. हे फिफ्टी-फिफ्टी काय आहे? हे काय नवं बिस्कीट आहे का? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. शिवसेना, भाजपा 50-50 करणार. राज्यातल्या जनतेसाठीदेखील काहीतरी शिल्लक ठेवा. भाजपा, शिवसेनेला केवळ सत्ता स्थापनेत रस आहे. अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीची त्यांना चिंता नाही. त्यांचं फक्त 50-50 सुरू आहे. हा कोणत्या प्रकारचा 'सब का साथ सब का विकास' आहे, असा प्रश्न ओवेसींनी उपस्थित केला. सत्ता वाटपाच्या चर्चेतलं वजन वाढवण्यासाठी सध्या शिवसेना, भाजपामध्ये अपक्ष आणि लहान पक्षांच्या उमेदवारांचा पाठिंबा मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यावर भाष्य करताना एमआयएम शिवसेना, भाजपापैकी कोणालाच पाठिंबा देणार नाही, असं ओवेसींनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन