शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'सत्ता स्थापनेसाठी भाजपा अपक्ष आमदारांसमोर भीक मागतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 07:41 IST

Maharashtra Election Result 2019: काँग्रेस खासदाराची भाजपावर जोरदार टीका

नवी दिल्ली: भाजपा सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागत असल्याची टीका काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणूक निकालावरुन आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालाबद्दल मला मतदारांचं अभिनंदन करायचं आहे. हरयाणा असो वा महाराष्ट्र किंवा देशात अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुका असोत, भाजपाचा पूर्णपणे पराभव झाला आहे. त्यांना चौटाला आणि अपक्ष आमदारांसमोर सत्ता स्थापन करण्यासाठी भीक मागावी लागत आहे. महाराष्ट्रात तर त्यांना अद्यापही सत्ता स्थापन करता आलेली नाही, अशा शब्दांत आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं. निवडणुकीच्या तोंडावर मूळ मुद्द्यांपासून मतदारांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो, असं आझाद म्हणाले. 'निवडणूक जवळ आली की क्षेपणास्त्रं डागायची, हा भाजपाचा फॉर्म्युला आहे. मात्र तो जनतेनं नाकारला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था यांच्यासारख्या समस्या जनतेला महत्त्वाच्या वाटतात. मात्र भाजपाला त्याबद्दल काहीही वाटत नाही,' अशी टीका आझाद यांनी केली. भाजपाला लोकांची चिंता नाही. नोटबंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. जीएसटीमुळे सर्वसामान्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. पेट्रोलचे दर वाढत आहेत. सरकारवर रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेण्याची वेळ आली आहे. मात्र याचं भाजपाला काहीच वाटत नाही, असं आझाद म्हणाले. भाजपा सतत इलेक्शन मोडमध्ये असते, असा टोलादेखील त्यांनी लगावला. भाजपा केवळ निवडणुका लढवण्यासाठी सत्तेत आली आहे. ते स्वप्नातही निवडणुका लढवत असतात. मंत्रालयातल्या कामकाजावेळीही भाजपाची नेते मंडळी निवडणुकांसाठी व्यूहनीती आखत असतात, असं आझाद यांनी म्हटलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसharyana election 2019हरियाणा निवडणूक