शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'सत्ता स्थापनेसाठी भाजपा अपक्ष आमदारांसमोर भीक मागतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 07:41 IST

Maharashtra Election Result 2019: काँग्रेस खासदाराची भाजपावर जोरदार टीका

नवी दिल्ली: भाजपा सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागत असल्याची टीका काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणूक निकालावरुन आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालाबद्दल मला मतदारांचं अभिनंदन करायचं आहे. हरयाणा असो वा महाराष्ट्र किंवा देशात अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुका असोत, भाजपाचा पूर्णपणे पराभव झाला आहे. त्यांना चौटाला आणि अपक्ष आमदारांसमोर सत्ता स्थापन करण्यासाठी भीक मागावी लागत आहे. महाराष्ट्रात तर त्यांना अद्यापही सत्ता स्थापन करता आलेली नाही, अशा शब्दांत आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं. निवडणुकीच्या तोंडावर मूळ मुद्द्यांपासून मतदारांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो, असं आझाद म्हणाले. 'निवडणूक जवळ आली की क्षेपणास्त्रं डागायची, हा भाजपाचा फॉर्म्युला आहे. मात्र तो जनतेनं नाकारला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था यांच्यासारख्या समस्या जनतेला महत्त्वाच्या वाटतात. मात्र भाजपाला त्याबद्दल काहीही वाटत नाही,' अशी टीका आझाद यांनी केली. भाजपाला लोकांची चिंता नाही. नोटबंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. जीएसटीमुळे सर्वसामान्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. पेट्रोलचे दर वाढत आहेत. सरकारवर रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेण्याची वेळ आली आहे. मात्र याचं भाजपाला काहीच वाटत नाही, असं आझाद म्हणाले. भाजपा सतत इलेक्शन मोडमध्ये असते, असा टोलादेखील त्यांनी लगावला. भाजपा केवळ निवडणुका लढवण्यासाठी सत्तेत आली आहे. ते स्वप्नातही निवडणुका लढवत असतात. मंत्रालयातल्या कामकाजावेळीही भाजपाची नेते मंडळी निवडणुकांसाठी व्यूहनीती आखत असतात, असं आझाद यांनी म्हटलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसharyana election 2019हरियाणा निवडणूक