शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'सत्ता स्थापनेसाठी भाजपा अपक्ष आमदारांसमोर भीक मागतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 07:41 IST

Maharashtra Election Result 2019: काँग्रेस खासदाराची भाजपावर जोरदार टीका

नवी दिल्ली: भाजपा सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागत असल्याची टीका काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणूक निकालावरुन आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालाबद्दल मला मतदारांचं अभिनंदन करायचं आहे. हरयाणा असो वा महाराष्ट्र किंवा देशात अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुका असोत, भाजपाचा पूर्णपणे पराभव झाला आहे. त्यांना चौटाला आणि अपक्ष आमदारांसमोर सत्ता स्थापन करण्यासाठी भीक मागावी लागत आहे. महाराष्ट्रात तर त्यांना अद्यापही सत्ता स्थापन करता आलेली नाही, अशा शब्दांत आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं. निवडणुकीच्या तोंडावर मूळ मुद्द्यांपासून मतदारांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो, असं आझाद म्हणाले. 'निवडणूक जवळ आली की क्षेपणास्त्रं डागायची, हा भाजपाचा फॉर्म्युला आहे. मात्र तो जनतेनं नाकारला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था यांच्यासारख्या समस्या जनतेला महत्त्वाच्या वाटतात. मात्र भाजपाला त्याबद्दल काहीही वाटत नाही,' अशी टीका आझाद यांनी केली. भाजपाला लोकांची चिंता नाही. नोटबंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. जीएसटीमुळे सर्वसामान्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. पेट्रोलचे दर वाढत आहेत. सरकारवर रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेण्याची वेळ आली आहे. मात्र याचं भाजपाला काहीच वाटत नाही, असं आझाद म्हणाले. भाजपा सतत इलेक्शन मोडमध्ये असते, असा टोलादेखील त्यांनी लगावला. भाजपा केवळ निवडणुका लढवण्यासाठी सत्तेत आली आहे. ते स्वप्नातही निवडणुका लढवत असतात. मंत्रालयातल्या कामकाजावेळीही भाजपाची नेते मंडळी निवडणुकांसाठी व्यूहनीती आखत असतात, असं आझाद यांनी म्हटलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसharyana election 2019हरियाणा निवडणूक