शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राखीव मतदारसंघांचाही भाजपवर विश्वास; अनुसूचित जातीच्या २९ पैकी १० जागांवर भाजप विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 09:15 IST

काँग्रेसने तीन, तर उद्धवसेनेने दोन जागा गमावल्या

विशाल सोनटक्केयवतमाळ - अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या राज्यातील २९ मतदारसंघांपैकी तब्बल दहा मतदारसंघांत भाजपचा विजयाचा झेंडा फडकला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सात जागा जिंकल्या होत्या. यातील तीन जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे चौघांनी तिसऱ्यांदा, तर तिघांनी सलग चौथ्यावेळी विजयाचा गुलाल उधळला. मिरज मतदारसंघातून सुरेश खाडे हे तब्बल पाचव्या वेळी विजयी झाले आहेत. 

सन २००८ च्या परिसीमनानंतर राज्यात अनुसूचित जातीचे २९, तर अनुसूचित जमातीचे २५ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २९ मतदारसंघांपैकी भाजपने नऊ, काँग्रेसने सात, राष्ट्रवादी काँग्रेसने सहा, शिवसेना पाच, तर अपक्षांनी दोन जागांवर विजय मिळविला होता. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्येही अनुसूचित जातीसाठीच्या या २९ जागांपैकी सर्वाधिक १० जागा भाजपने जिंकल्या आहेत. काँग्रेसला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. उद्धवसेना आणि  शरद पवार गटाला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या; तर  शिंदेसेना आणि अजित पवार गटाने प्रत्येकी चार जागा पटकावल्या आहेत. हातकणंगले येथील एक जागा जनस्वराज्य पक्षाने जिंकली आहे.

चौघांनी मारला विजयाचा चौकार 

अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातील भुसावळचे उमेदवार संजय सावकारे, औरंगाबाद पश्चिममधील शिंदेसेनेचे संजय शिरसाट आणि अंबरनाथमधील बालाजी किणीकर हे तीन उमेदवार सलग चौथ्या वेळी विजयी झाले; तर नागपूर उत्तरमधून काँग्रेसचे नितीन राऊत, भंडारातून  नरेंद्र भोंडेकर, बदनापूरमधून नारायण कुचे आणि पुण्यातील पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे हे सलग तिसऱ्या वेळी विजयी झाले. नांदेडमधील देगलूर येथून काँग्रेसतर्फे रावसाहेब अंतापूरकर दोन वेळा निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर पुत्र जितेश अंतापूरकर यांनी पोटनिवडणूक जिंकली. यावेळी ते दुसऱ्यांदा भाजपतर्फे विजयी झाले. 

लोकसभेत ४ पैकी ३ जागा गमावल्या होत्या

लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी चार मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी भाजपचा पराभव झाला होता. दिंडोरीत तेव्हाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, नंदुरबारमध्ये डॉ.हीना गावित तर गडचिरोलीत अशोक नेते यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मतविभाजनाचा फायदा होऊन पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा जिंकले होते. भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांनी प्रचारात समान नागरी कायदा आणणार असे जाहीर केले होते. असा कायदा आल्यास आदिवासींना घटनेने दिलेले विशेष हक्क संपुष्टात येतील, असा प्रचार मविआ नेत्यांनी केला आणि त्याचा फटका भाजपला बसला असे समोर आले होते.

मिरजमधून सुरेश खाडे पाचव्या वेळी विजयीमिरज या राखीव मतदारसंघातून भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे हे उद्धवसेनेच्या तानाजी सातपुते यांचा पराभव करून पाचव्या वेळी विजयी झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्षाचे ज्ञानराज चौगुले यांचा मात्र चौथ्या वेळी पराभव झाला आहे. साताऱ्यातील फलटण येथेही तीन वेळा आमदार राहिलेल्या दीपक चव्हाण यांना यावेळी पराभवाचे तोंड पाहावे लागले. मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून खासदार वर्षा गायकवाड या काँग्रेसकडून सलग तीन वेळा आमदार होत्या. आता या जागेवर ज्योती गायकवाड निवडून आल्या आहेत. वाशिमची राखीव जागाही भाजपने सलग चौथ्यावेळी राखली आहे. येथून लखन मलिक सलग तीन निवडणुकांत भाजपतर्फे विजयी झाले होते. यावेळी भाजपने श्याम खोडे यांना उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजयाचा गुलाल उधळला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस