शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 12:27 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसला आव्हान दिले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे उद्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहेत. एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत, काही एक्झिटमध्ये महायुतीचे सरकार येणार, तर काही काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसला आव्हान दिले आहे. 

Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!

कालपासून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरु आहे. दरम्यान, आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रि‍पदावर भाष्य केले. खासदार संजय राऊत म्हणाले, उद्या दहा नंतर मी मुख्यमंत्री कोण असणार हे सांगणार. महाविकास सरकार आले तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय महाराष्ट्रात होईल. काँग्रेसचे जे प्रमुख नेते येथे येतील त्यांना दिल्लीतून मँडेट घेऊनच येथे यावे लागले, असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिले. शरद पवार, उद्धव ठाकरे मुंबईत आहेत. आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ, नाहीतर भारतीय जनता पक्ष आमच्या हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतके ते क्रुर लोक आहेत, असा टोलाही राऊत यांनी भाजपाला लगावला. 

सोलापुरातील वादावर बोलताना राऊत म्हणाले,  दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृत सुटल्यावर महाविकास आघाडीच्या सर्व जणांनी काम करणे अपेक्षित होतं, महाराष्ट्रात काही ठिकाणी असे प्रकार झाले आहेत,काही अपवाद आहेत उद्या निकाल लागल्यावर एकत्र बसून चर्चा करू.  का घडतंय हे तपासून पहावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले. 

"सरकार मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात. आमच्याबरोबर डावी पक्ष आहेत शेकाप आहे.हे सर्व महाविकास आघाडीचे घटक आहेत. काही अपक्षाने पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे.जे पैशांचे बंडल डोक्याखाली ठेवून झोपतात त्यांना ५० -१०० कोटीची ऑफर अपक्षांना केली आहे. ज्यांना जिंकून येत नाही त्यांनी अपक्षांना बंडलांच्या थैल्या पाठवल्या जात आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस