शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

Maharashtra Vidhan Sabha: "बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार; ५० आमदारांनी साथ दिली ते माझं भाग्य"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 12:24 IST

आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली त्याबद्दल सरकारच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. या सभागृहाचा अध्यक्ष झाल्यानंतर मोठी मानाची पदे भूषवणारे नेते आहेत. देशपातळीवर नेत्यांना गौरवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घटनांची नोंद सगळ्यांनी घेतली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक घटना आहे. कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करत होता. परंतु आता तुमची गरिमा वाढली आहे. सामाजिक जीवनातील व्याप्ती वाढली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रतिक असलेल्या सार्वभौमत्व सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी आपण विराजमान झाला आहात. राज्यातील गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या माध्यमातून सुटतील अशी अपेक्षा आहे. त्याचसोबत लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण अबाधित राहील. आपण न्यायदान करता कायद्यासमोर सर्व समान तत्वाने काम कराल अपेक्षा. राज्याचा कारभार पारदर्शकपणे चालवायचा आहे. प्रसंगी आपण मुक्तपणे निर्णय घेऊन मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तरूण आमदारांच्या व्यथा सोडवण्याचे तुम्ही प्रयत्न करावेत. आपण यापूर्वीही विधानसभा, विधान परिषदेत काम केले आहे. त्या कामकाजाच्या अनुभवाचा या सभागृहाला फायदा होईल. वकील म्हणून शिवसेना पक्षासाठी अनेक खटले लढवलेत. महिलांसाठी असणाऱ्या शक्ती कायदा मागील काळात संमत करण्यात आला. त्यातही आपला सहभाग होता. विरोधी बाकांवर बसून आपण सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन केले. आपल्या सूचनांचा फायदा झाला आहे. या सभागृहातील कोणत्याही सदस्यांवर अन्याय न होता त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी सहकार्य मिळेल. सभागृहात काही चुकीचा पायंडा पडण्यापूर्वी आपण समज द्याल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे. आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्यात विरोधकांकडून सत्ताधारीत जाण्याच्या घडल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली. माझ्यासह ८ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. मला ५० आमदारांनी साथ दिली. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो. कुणावरची जोरजबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. ज्याला वाटलं त्यांना विशेष विमानानं परत पाठवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

भाजपा नेत्यांचे मानले आभारमला काही नको होतं, माझी कुठलीही अपेक्षा नव्हती. परंतु लोकशाहीत भारतीय जनता पार्टीने सन्मान करत वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला. त्याचसोबत १०५ आमदार असूनही मुख्यमंत्रिपद देण्याचं काम केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, जे.पी नड्डा आणि भाजपाच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाRahul Narvekarराहुल नार्वेकर