शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : अपराजित राहिलेले राज्यातील अभेद्य बालेकिल्ले, यंदा काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 06:10 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : राजकीय पटलावर कोणाची हवा, लाट असो पण राज्यात असे काही मतदारसंघ अर्थात बालेकिल्ले आहेत की तेथील नेत्यांना हरविणे महाकठीण आहे.

- असिफ कुरणेकोल्हापूर : राजकीय पटलावर कोणाची हवा, लाट असो पण राज्यात असे काही मतदारसंघ अर्थात बालेकिल्ले आहेत की तेथील नेत्यांना हरविणे महाकठीण आहे. अनेक राजकीय उलथापालथीत देखील या महारथींनी आपले बालेकिल्ले शाबूत ठेवले आहेत. दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून हे नेते आपल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत आहेत. सत्तेत असो की विरोधात येथील जनतेने देखील आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवत त्यांना विधानसभा सभागृहात पाठविले आहे. राज्यातील असेच काही अभेद्य मतदारसंघ व तेथील आमदारांचा आढावा.गणपतराव देशमुख (सांगोला) :सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून तब्बल ११ वेळा विजय मिळविला आहे. १९७८ व १९९९ मध्ये ते मंत्री होते. ‘देशात सर्वाधिक काळ आमदार’ राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यानंतर सर्वाधिक काळ करुणानिधी हे १० वेळा आमदार राहिले आहेत.शरद पवार, अजित पवार ( बारामती) :पवार कुटुंबीय व बारामती यांचे वेगळे नाते असून हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातूनशरद पवार व अजित पवार प्रत्येकी सहावेळा आमदार झाले आहेत. आता सातव्यांदा अजित पवार येथून मैदानात उतरतील. सन १९६२ मध्ये मालतीबाई शिरोळे या प्रथम येथून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर पवार कुटुंबाचेच या मतदारसंघावर वर्चस्व आहे.जीवा पांडू गावित (सुरगाणा)सुरगाणा व कळवण मतदारसंघांतून जीवा गावित सातव्यांदा आमदार झाले आहेत. १३ व्या विधानसभागृहात ते ‘सीपीआय’चे एकमेव आमदार आहेत. डाव्या पक्षांची पीछेहाट होत असताना गावित यांनी आपला डाव्यांचा गढ कायम राखण्यात यश मिळविले आहे.जयंत पाटील (वाळवा, इस्लामपूर) :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वाळवा इस्लामपूर मतदारसंघाचे १९९० पासून प्रतिनिधित्व करत आहेत. ते सहावेळा आमदार झाले आहेत. त्यांनी मंत्री म्हणून अर्थ, गृह, ग्रामविकास अशी खाती सांभाळली. नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला.एकनाथ खडसे (मुक्ताईनगर) :जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा गड आहे. या मतदारसंघातून खडसे सहावेळा आमदार झाले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघात सन १९९० मध्ये खडसे यांनी विजय मिळविला. तेव्हापासून ते येथे प्रतिनिधित्व करत आहेत.बाळासाहेब थोरात (संगमनेर) :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ त्यांचा गड आहे. या ठिकाणातून ते सातवेळा विजयी झाले असून आठव्यांदा मैदानात उतरत आहेत. बी. जे. खताळ-पाटील यांच्यानंतर थोरात हे आमदार झाले.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) :अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे प्रतिनिधीत्व करणारे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येथे पाचवेळा विजय मिळवला आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र शिर्डी हा मतदारसंघ ठरला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.विलासराव देशमुख (लातूर ) :लातूर येथून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पाचवेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांचा १९९५ मध्ये शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर विलासराव दोनवेळा विजयी झाले. त्यांच्या निधनानंतर पुत्र अमित देशमुख हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.सुरूपसिंग नाईक (नवापूर )नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर हा आरक्षित मतदारसंघ सुरूपसिंग नाईक यांचा गड. येथून ते आठवेळा विजयी झाले. त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. २००९ मध्ये त्यांना १७०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.आर. आर. पाटील (तासगाव) :तासगाव मतदार संघालामाजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी देशपातळीवर ओळख मिळवून दिली. सन १९९०पासून त्यांनी सहावेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर आर. आर. आबांच्या पत्नी सुमनताईपाटील या प्रतिनिधित्व करत आहेत.पतंगराव कदम(पलूस, कडेगाव ) :काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम हे येथून सहावेळा निवडून आले व दोनदा पराभूत झाले होते. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर हा त्यांचा गड मानला जातो. कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण