शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार! २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:28 IST

पुन्हा फडणवीस सरकार की, सत्तांतर होणार?; आघाडीचं ठरलं, युतीचं घोडं का अडलं?; मनसेच्या ‘राजगडा’ला केव्हा जाग येणार?

नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून दोन्ही राज्यांत २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे; तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारराजाने दिलेला कौल धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येलाच निकालाच्या स्वरूपात जाहीर होईल आणि ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर नवे सरकार सत्तारूढ होण्याचा मार्ग मोकळा झालेला असेल. राज्यातील सुमारे नऊ कोटी मतदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पुन्हा संधी देणार की, २०१४ प्रमाणे राज्यात सत्तांतर घडवून आणणार, याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागून आहे.केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसह देशातील ६४ विधानसभा आणि बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी नवी दिल्ली येथे जाहीर केला. त्यानंतर लगेच आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लांबणीवर टाकली. महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होणार असून, त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रे असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.तीन आजी-माजी मुख्यमंत्री पुन्हा रिंगणातया निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अशोक चव्हाण (भोकर) आणि पृथ्वीराज चव्हाण (कºहाड) हे तीन आजी-माजी मुख्यमंत्री पुन्हा रिंगणार उतरणार असून, या मतदारसंघातील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.वंचित फॅक्टर चालणार का?अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत सात ते आठ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग रोखला होता. मात्र, त्या वेळी एमआयएमसोबत त्यांची युती होती. आता ही युती संपुष्टात आल्याने विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर किती चालणार, याविषयी उत्सुकता आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करणार?लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता प्रचारसभा घेऊन मोदी सरकारवर तोफा डागलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख विधानसभा निवडणूक लढविणार का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मनसे शंभर जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र या १०० जागा कोणत्या, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रम२७ सप्टेंबर (शुक्रवार)- उमेदवारी अर्ज दाखल करता येणार४ ऑक्टोबर (शुक्रवार)- अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस५ ऑक्टोबर (शनिवार)- अर्जांची छाननी७ ऑक्टोबर (सोमवार)- अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस१९ ऑक्टोबर (शनिवार)- प्रचाराचा शेवटचा दिवस२१ ऑक्टोबर (सोमवार)- मतदान२४ ऑक्टोबर (गुरुवार)- निकाल

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस