शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Vidhan sabha 2019 : मतदार वाढले, पण मतांच्या टक्केवारीची झोळी फाटकीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:57 AM

एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत विविध राजकीय पक्षांनी रॅली, सभांमधून आपली भूमिका मांडली.

- प्रशांत माने एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत विविध राजकीय पक्षांनी रॅली, सभांमधून आपली भूमिका मांडली. पथनाट्ये, स्वाक्षरी मोहीम आणि अन्य मोहीमांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती केली. परंतु मतदानाच्या दिवशी मात्र जेवढा मतदानाचा टक्का दिसायला हवा होता तेवढा दिसला नाही. २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का केवळ ३ टक्क्यांनी वाढला. राज्यात व देशात मतदानाची टक्केवारी लक्षणिय वाढली असताना कल्याण-डोंबिवली या सुशिक्षितांच्या शहरात मतांची टक्केवारी जेमतेम असावी ही चिंतेची बाब ठरली. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेली नवमतदारांची नोंदणी चार मतदारसंघात वाढली आहे. परंतु मागील २००९ आणि २०१४ ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी पाहता ज्याप्रमाणात मतदार नोंदणीचे प्रमाण वाढले त्याप्रमाणात विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलेली नाही.लोकसभा, विधानसभा अथवा महापालिका यापैकी कोणतीही निवडणूक असो, येथील मतदानाची कमी टक्केवारी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ उदयास आला तर दुसरीकडे कल्याण विधानसभेचे विभाजन होऊन डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण असे चार विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले. कल्याण लोकसभेच्या निर्मितीपासूनचा आढावा घेता २००९ च्या पहिल्या निवडणुकीत ३४.३० टक्के मतदान झाले होते. २०१४ ला ४२.८८ तर नुकत्याच एप्रिल-मे मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत ४५.२८ टक्के मतदानाची नोंद झाली. ३१ जानेवारीपर्यंत या मतदारसंघात ३८ हजार नवमतदारांची नोंद झाली होती. त्यात राजकीय पक्षांकडून मतदान करा, असे आवाहन केले गेले असताना मतदानाच्या दिवशी एकही मतदार मागे राहू नये यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रमही राबविण्यात आले होते. आयोगाकडून मतदानवाढीसाठी विशेष मेहनत घेतली गेली होती. मतदारसंघातील विविध प्राधिकरणांकडून जनजागृतीसाठी मोहीमा राबवल्या गेल्या.त्याचबरोबर स्वाक्षरी मोहीम, बॅनर, होर्डिंग्ज, पथनाट्ये, सायकल रॅली, चुनाव पाठशाला आदी उपक्रम राबविण्याबरोबरच केडीएमसीच्या वतीने गुढीपाडव्याला निघालेल्या नववर्ष स्वागतयात्रेत ‘मतदान करा’ असा संदेश देण्यात आला होता. मतदानात प्रत्येक घटकाचा समावेश असावा याकरिता विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परंतु त्यावेळी झालेल्या मतदानाचा आकडा पाहता २०१४ च्या मानाने २०१९ मध्ये केवळ तीन टक्क्यांनी मतदान वाढल्याचे दिसून आले. अलीकडेच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. शुक्रवारपासून निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला आहे. ७ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याने राजकीय पक्षाला निवडणुकीच्या प्रचारासाठी फारच थोडा अवधी मिळणार आहे. २१ आॅक्टोबर मतदानाचा दिवस तर मतमोजणी २४ आॅक्टोबरला होणार आहे. २००९ आणि २०१४ ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेता कल्याण पश्चिम, पूर्व, ग्रामीण आणि डोंबिवली या चारही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ही ४४ ते ४७ टक्क्यांच्या आसपासच राहिली आहे. महत्वाचे म्हणजे यंदा ३१ आॅगस्टपर्यंत झालेल्या मतदारनोंदणीत चारही मतदारसंघात नवमतदारांचा आकडा वाढला आहे. एप्रिल-मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नोंद झालेल्या मतदारांच्या तुलनेत विधासभेच्या कल्याण पश्चिममध्ये १५ हजार, कल्याण पूर्वेत चार हजार, कल्याण ग्रामीणमध्ये ११ हजार तर डोंबिवली मतदारसंघात सात हजार मतदार वाढले आहेत ही निश्चितच चांगली बाब आहे. परंतु मतदारांची ही वाढलेली संख्या प्रत्यक्ष मतदानात दिसणे आवश्यक आहे. पण तेवढा उत्साह दिसून येत नाही.कल्याण डोंबिवली ही सुशिक्षितांची शहरे आहेत पण उर्वरीत ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी ५७ ते ६९ टक्क्यांपर्यंत जात असताना इथेच ती पन्नाशी गाठण्यापूर्वी धापा टाकते हे वास्तव आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून विविध क्लृप्त्या लढवून निवडणूक आयोगातर्फे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. मतदारांना त्रास होऊ नये म्हणून यंदा सर्वच ठिकाणी मतदान केंद्र तळमजल्यावर असावीत असा निर्णय आयोगाने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर पुन्हा एकदा मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी मतदान जागृतीचे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे ही काळाची गरज आहे हे आपण विसरून चालणार नाही. एका दिवसाच्या मतदानाने आपल्याला पाच वर्षाची भूमिका मांडायची असते आपल्या अवतीभवतीचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी निश्चित भूमिका मतदानातून घेणे आवश्यक आहे. आपल्यातील उदासिनतेमुळे चुकीचा उमेदवार निवडून आला तर त्याचे परिणाम पुढील पाच वर्षे आपल्याला भोगावे लागणार आहेत हे तितकेच खरे.कल्याण व डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नोंदणी लक्षणीय आहे. मात्र हे नोंदणी केलेले मतदार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठे जातात. या दोन्ही शहरांमधील मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपासही जात नाही. सुशिक्षितांच्या शहरातील मतदार आपल्या लौकिकास साजेसे वर्तन का करीत नाहीत, हाच प्रश्न आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyanकल्याण