शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

Vidhan Sabha 2019 : बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर आशिष देशमुख यांची घणाघाती टीका, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 13:28 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

ठळक मुद्दे काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर देतान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पाच कार्याध्यक्षांवर घणाघाती टीकाप्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरपुरते प्रदेशाध्यक्ष आहेत की काय, अशी चर्चा

नागपूर - राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेने सर्वस्व पणाला लावले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पण काँग्रेसच्या आघाडीवर मात्र निवडणुकीबाबत म्हणावा तसा उत्साह दिसून आलेला नाही. त्यातच काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर देतान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पाच कार्याध्यक्षांवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना आशिष देशमुख यांनी बाळासाहेब थोरात आणि पाच कार्यांध्यक्षांवर टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरपुरते प्रदेशाध्यक्ष आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली. तसेच निवडण्यात आलेल्या पाच कार्याध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपाची विचारसरणी ही संघाची आहे. त्यावर गोळवलकर, हेडगेवार यांच्या विचारांचा पगडा आहे. हे विचार देशाच्या किती उपयोगी आहेत, हा प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पक्ष सोडण्याचा विचार करताय का, असे विचारले असता पक्ष सोडण्याचा आपला कुठलाही विचार नाही. मी काँग्रेससोबतच राहीन, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच समाज कार्य करताना निवडणूक लढवणेच गरजचेचे नाही, असे सांगत देशमुख यांनी निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर संभ्रम कायम ठेवला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखBalasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस