शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: निवडणूक जाहीर; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:40 IST

विरोधक: बेरोजगारीवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार; सत्ताधारी: पंधरा वर्षांत झाले नाही, ते करून दाखवले

विकासाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी मागणार जनतेचा कौल-यदु जोशीमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाच्या सावलीत होत असलेली ही निवडणूक अ‍ॅडव्हान्टेज युती अशी असेल.निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सर्वच प्रकारची कुमक लक्षात घेता भाजप-शिवसेना युती ही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपेक्षा कितीतरी पुढे असल्याचे दिसते.जमेची बाजूदेवेंद्र फडणवीस यांच्यासारखे आश्वासक नेतृत्व. त्यास भाजप पक्षसंघटनेची जोरदार साथभाजप-शिवसेनेची एकत्रित ताकद. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये अत्यंत चांगला समन्वय.शेतकरी कर्जमाफीसोबतच पायाभूत सुविधा प्रकल्प, मेट्रो, समृद्धी महामार्ग यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे विकासाभिमुख प्रतिमामराठा समाजास दिलेले आरक्षण, या समाजासाठी सारथी संस्थेची स्थापना, ओबीसी कल्याणाचे निर्णय, डीबीटीद्वारे लाभार्र्थींच्या खात्यात थेट रक्कम.जलयुक्त शिवारचे यश, पंतप्रधान आवास योजनेत हजारोंना घरे, मुख्यमंत्री ग्रामसडकमधील कामे.बसणार फटकाफडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांवर झालेले घोटाळ्यांचे आरोप. इतर पक्षांमधून केलेल्या मेगाभरतीमुळे भाजप-शिवसेनेच्या केडरमधील कार्यकर्त्यांची नाराजीनेते कितीही एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेनेत अनेक ठिकाणी असलेला समन्वयाचा अभाव. युती झाल्याने काही ठिकाणी बंडखोरीची भीती.उमेदवार बदलले नाही तर काही मतदारसंघात अ‍ॅण्टी इन्कंबन्सीचा फटका बसू शकतो. विशेषत: ज्यांनी तीन टर्म पूर्ण केलेल्या आहेत.कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी, बेरोजगारी हे मुद्दे सरकारच्या विरोधात जाणारे आहेत. यादीत नाव असताना काहींना फायदा मिळाला नाही.सरकारच्या आभासी विकासावर हल्ला चढवणार विरोधक- अतुल कुलकर्णी मुंबई : आपला विरोधीपक्ष नेता भाजपच्या जवळ जात आहे हे लक्षात येऊनही पक्षनेत्यांनी वेळीच लक्ष दिले नाही. राष्टÑवादीने नगरच्या जागेसाठी नको तेवढा हट्ट धरला व विखे पाटील भाजपमध्ये गेले. परिणामी] दोन्ही काँग्रेसला गळती लागली. ती अजूनही थांबत नाही. पक्ष वाढवावा अशी इच्छाशक्ती दोघांकडेही उरली नाही. आपत्तीला इष्टापत्तीत बदलण्याची धमक असणारे नेते ‘शेल’मध्ये गेले. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.जमेची बाजूवंचित आणि एमआयएम भाजपची टीम असल्याचे स्पष्ट झाल्याने दलित मुस्लिम मतदार काँग्रेसकडे येईल.अनेकजण पक्ष सोडून गेल्याने काँग्रेस, राष्टÑवादीला जिल्ह्याजिल्ह्यात तरुणांची नवी फळी उभी करण्याची मोठी संधी.आर्थिक मंदी, बेरोजगारी, वाढती महागाई, महिलांच्या अत्याचारात वाढ, नुसतीच आश्वासने; असे अनेक विषय विरोधकांकडे आहेत.शरद पवार यांनी राज्यभरात तरुणांना घातलेली साद, काँग्रेसचा पारंपारिक मतदार, भरमसाठ इनकमिंगमुळे भाजपमध्ये तयार झालेली नाराजी फायद्याची ठरेल.खºया अर्थाने धर्मनिरपेक्षता दाखवण्यात यश आले तर एक मोठा वर्ग दोन्ही काँग्रेसकडे वळू शकतो.बसणार फटकानात्यागोत्याचेच राजकारण करण्याची वृत्ती दोन्ही पक्षांना अडचणीत आणण्याचे कारण ठरणारसाम, दाम, दंड, भेद आणि पैसा वापरण्याची क्षमता असली तरी ते वापरण्याची इच्छाशक्ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तसूभरही दिसत नाही.राष्टÑवादीची सगळी मदार एकट्या शरद पवार यांच्यावर. अन्य नेत्यांमधे धनंजय मुंडे वगळता एकही नेता आक्रमकपणे समोर येत नाही.तरुणांना दोन्ही काँग्रेसमध्ये भवितव्य आहे असे वाटत नाही, तो विश्वास तयार करण्यात नेत्यांना सपशेल अपयश आल्याचा मोठा फटका यावेळी बसू शकतो.दोन्ही पक्षांनी कार्यकर्ते आणि केडर तयार करण्याकडे गेल्या पाच वर्षात केलेले अक्षम्य दुर्लक्ष.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस