शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Vidhan Sabha 2019: निवडणूक जाहीर; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:40 IST

विरोधक: बेरोजगारीवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार; सत्ताधारी: पंधरा वर्षांत झाले नाही, ते करून दाखवले

विकासाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी मागणार जनतेचा कौल-यदु जोशीमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाच्या सावलीत होत असलेली ही निवडणूक अ‍ॅडव्हान्टेज युती अशी असेल.निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सर्वच प्रकारची कुमक लक्षात घेता भाजप-शिवसेना युती ही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपेक्षा कितीतरी पुढे असल्याचे दिसते.जमेची बाजूदेवेंद्र फडणवीस यांच्यासारखे आश्वासक नेतृत्व. त्यास भाजप पक्षसंघटनेची जोरदार साथभाजप-शिवसेनेची एकत्रित ताकद. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये अत्यंत चांगला समन्वय.शेतकरी कर्जमाफीसोबतच पायाभूत सुविधा प्रकल्प, मेट्रो, समृद्धी महामार्ग यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे विकासाभिमुख प्रतिमामराठा समाजास दिलेले आरक्षण, या समाजासाठी सारथी संस्थेची स्थापना, ओबीसी कल्याणाचे निर्णय, डीबीटीद्वारे लाभार्र्थींच्या खात्यात थेट रक्कम.जलयुक्त शिवारचे यश, पंतप्रधान आवास योजनेत हजारोंना घरे, मुख्यमंत्री ग्रामसडकमधील कामे.बसणार फटकाफडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांवर झालेले घोटाळ्यांचे आरोप. इतर पक्षांमधून केलेल्या मेगाभरतीमुळे भाजप-शिवसेनेच्या केडरमधील कार्यकर्त्यांची नाराजीनेते कितीही एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेनेत अनेक ठिकाणी असलेला समन्वयाचा अभाव. युती झाल्याने काही ठिकाणी बंडखोरीची भीती.उमेदवार बदलले नाही तर काही मतदारसंघात अ‍ॅण्टी इन्कंबन्सीचा फटका बसू शकतो. विशेषत: ज्यांनी तीन टर्म पूर्ण केलेल्या आहेत.कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी, बेरोजगारी हे मुद्दे सरकारच्या विरोधात जाणारे आहेत. यादीत नाव असताना काहींना फायदा मिळाला नाही.सरकारच्या आभासी विकासावर हल्ला चढवणार विरोधक- अतुल कुलकर्णी मुंबई : आपला विरोधीपक्ष नेता भाजपच्या जवळ जात आहे हे लक्षात येऊनही पक्षनेत्यांनी वेळीच लक्ष दिले नाही. राष्टÑवादीने नगरच्या जागेसाठी नको तेवढा हट्ट धरला व विखे पाटील भाजपमध्ये गेले. परिणामी] दोन्ही काँग्रेसला गळती लागली. ती अजूनही थांबत नाही. पक्ष वाढवावा अशी इच्छाशक्ती दोघांकडेही उरली नाही. आपत्तीला इष्टापत्तीत बदलण्याची धमक असणारे नेते ‘शेल’मध्ये गेले. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.जमेची बाजूवंचित आणि एमआयएम भाजपची टीम असल्याचे स्पष्ट झाल्याने दलित मुस्लिम मतदार काँग्रेसकडे येईल.अनेकजण पक्ष सोडून गेल्याने काँग्रेस, राष्टÑवादीला जिल्ह्याजिल्ह्यात तरुणांची नवी फळी उभी करण्याची मोठी संधी.आर्थिक मंदी, बेरोजगारी, वाढती महागाई, महिलांच्या अत्याचारात वाढ, नुसतीच आश्वासने; असे अनेक विषय विरोधकांकडे आहेत.शरद पवार यांनी राज्यभरात तरुणांना घातलेली साद, काँग्रेसचा पारंपारिक मतदार, भरमसाठ इनकमिंगमुळे भाजपमध्ये तयार झालेली नाराजी फायद्याची ठरेल.खºया अर्थाने धर्मनिरपेक्षता दाखवण्यात यश आले तर एक मोठा वर्ग दोन्ही काँग्रेसकडे वळू शकतो.बसणार फटकानात्यागोत्याचेच राजकारण करण्याची वृत्ती दोन्ही पक्षांना अडचणीत आणण्याचे कारण ठरणारसाम, दाम, दंड, भेद आणि पैसा वापरण्याची क्षमता असली तरी ते वापरण्याची इच्छाशक्ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तसूभरही दिसत नाही.राष्टÑवादीची सगळी मदार एकट्या शरद पवार यांच्यावर. अन्य नेत्यांमधे धनंजय मुंडे वगळता एकही नेता आक्रमकपणे समोर येत नाही.तरुणांना दोन्ही काँग्रेसमध्ये भवितव्य आहे असे वाटत नाही, तो विश्वास तयार करण्यात नेत्यांना सपशेल अपयश आल्याचा मोठा फटका यावेळी बसू शकतो.दोन्ही पक्षांनी कार्यकर्ते आणि केडर तयार करण्याकडे गेल्या पाच वर्षात केलेले अक्षम्य दुर्लक्ष.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस