शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: निवडणूक जाहीर; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:40 IST

विरोधक: बेरोजगारीवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार; सत्ताधारी: पंधरा वर्षांत झाले नाही, ते करून दाखवले

विकासाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी मागणार जनतेचा कौल-यदु जोशीमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाच्या सावलीत होत असलेली ही निवडणूक अ‍ॅडव्हान्टेज युती अशी असेल.निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सर्वच प्रकारची कुमक लक्षात घेता भाजप-शिवसेना युती ही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपेक्षा कितीतरी पुढे असल्याचे दिसते.जमेची बाजूदेवेंद्र फडणवीस यांच्यासारखे आश्वासक नेतृत्व. त्यास भाजप पक्षसंघटनेची जोरदार साथभाजप-शिवसेनेची एकत्रित ताकद. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये अत्यंत चांगला समन्वय.शेतकरी कर्जमाफीसोबतच पायाभूत सुविधा प्रकल्प, मेट्रो, समृद्धी महामार्ग यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे विकासाभिमुख प्रतिमामराठा समाजास दिलेले आरक्षण, या समाजासाठी सारथी संस्थेची स्थापना, ओबीसी कल्याणाचे निर्णय, डीबीटीद्वारे लाभार्र्थींच्या खात्यात थेट रक्कम.जलयुक्त शिवारचे यश, पंतप्रधान आवास योजनेत हजारोंना घरे, मुख्यमंत्री ग्रामसडकमधील कामे.बसणार फटकाफडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांवर झालेले घोटाळ्यांचे आरोप. इतर पक्षांमधून केलेल्या मेगाभरतीमुळे भाजप-शिवसेनेच्या केडरमधील कार्यकर्त्यांची नाराजीनेते कितीही एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेनेत अनेक ठिकाणी असलेला समन्वयाचा अभाव. युती झाल्याने काही ठिकाणी बंडखोरीची भीती.उमेदवार बदलले नाही तर काही मतदारसंघात अ‍ॅण्टी इन्कंबन्सीचा फटका बसू शकतो. विशेषत: ज्यांनी तीन टर्म पूर्ण केलेल्या आहेत.कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी, बेरोजगारी हे मुद्दे सरकारच्या विरोधात जाणारे आहेत. यादीत नाव असताना काहींना फायदा मिळाला नाही.सरकारच्या आभासी विकासावर हल्ला चढवणार विरोधक- अतुल कुलकर्णी मुंबई : आपला विरोधीपक्ष नेता भाजपच्या जवळ जात आहे हे लक्षात येऊनही पक्षनेत्यांनी वेळीच लक्ष दिले नाही. राष्टÑवादीने नगरच्या जागेसाठी नको तेवढा हट्ट धरला व विखे पाटील भाजपमध्ये गेले. परिणामी] दोन्ही काँग्रेसला गळती लागली. ती अजूनही थांबत नाही. पक्ष वाढवावा अशी इच्छाशक्ती दोघांकडेही उरली नाही. आपत्तीला इष्टापत्तीत बदलण्याची धमक असणारे नेते ‘शेल’मध्ये गेले. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.जमेची बाजूवंचित आणि एमआयएम भाजपची टीम असल्याचे स्पष्ट झाल्याने दलित मुस्लिम मतदार काँग्रेसकडे येईल.अनेकजण पक्ष सोडून गेल्याने काँग्रेस, राष्टÑवादीला जिल्ह्याजिल्ह्यात तरुणांची नवी फळी उभी करण्याची मोठी संधी.आर्थिक मंदी, बेरोजगारी, वाढती महागाई, महिलांच्या अत्याचारात वाढ, नुसतीच आश्वासने; असे अनेक विषय विरोधकांकडे आहेत.शरद पवार यांनी राज्यभरात तरुणांना घातलेली साद, काँग्रेसचा पारंपारिक मतदार, भरमसाठ इनकमिंगमुळे भाजपमध्ये तयार झालेली नाराजी फायद्याची ठरेल.खºया अर्थाने धर्मनिरपेक्षता दाखवण्यात यश आले तर एक मोठा वर्ग दोन्ही काँग्रेसकडे वळू शकतो.बसणार फटकानात्यागोत्याचेच राजकारण करण्याची वृत्ती दोन्ही पक्षांना अडचणीत आणण्याचे कारण ठरणारसाम, दाम, दंड, भेद आणि पैसा वापरण्याची क्षमता असली तरी ते वापरण्याची इच्छाशक्ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तसूभरही दिसत नाही.राष्टÑवादीची सगळी मदार एकट्या शरद पवार यांच्यावर. अन्य नेत्यांमधे धनंजय मुंडे वगळता एकही नेता आक्रमकपणे समोर येत नाही.तरुणांना दोन्ही काँग्रेसमध्ये भवितव्य आहे असे वाटत नाही, तो विश्वास तयार करण्यात नेत्यांना सपशेल अपयश आल्याचा मोठा फटका यावेळी बसू शकतो.दोन्ही पक्षांनी कार्यकर्ते आणि केडर तयार करण्याकडे गेल्या पाच वर्षात केलेले अक्षम्य दुर्लक्ष.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस