शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

500 किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघिणीला गोळ्या घालण्यावर कोर्टाचं शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 12:48 IST

नरभक्षक वाघिणीला मारण्याचा वनविभागाचा निर्णय योग्य असल्याचे कोर्टाने नमूद केले असून शिकाऱ्यांच्या गोळ्या तिच्यावर बरसतील हे नक्की झाले आहे

ठळक मुद्देया वाघिणीवर या 500 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान ठेवण्यात आलेली पाळत ही भारतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी पाळत ठरण्याची शक्यतानिष्णात शिकाऱ्यांना गुंगारा देत या वाघिणीनं 500 किलोमीटरचा प्रदेश पालथा घातला. या प्रवासात जनावरांवर हल्ला करण्याबरोबरच दोन माणसांचा बळीही तिनं घेतला

नागपूर - चंद्रपूरच्या जंगलातल्या या वाघिणीने गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 500 किलोमीटर्सचा प्रवास केला आहे. मिळेल ती जनावरं मारून खाणाऱ्या या वाघिणीनं दोन माणसांचा जीव घेतला आणि वनविभागानं तिला ठार मारण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिला मारू नये अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे करण्यात आली होती. नरभक्षक वाघिणीला मारण्याचा वनविभागाचा निर्णय योग्य असल्याचे कोर्टाने नमूद केले असून शिकाऱ्यांच्या गोळ्या तिच्यावर बरसतील हे नक्की झाले आहे.

बोरच्या जंगलात 29 जुलै रोजी म्हणजे सुमारे 76 दिवसांपूर्वी या वाघिणीला सोडण्यात आले होते. जंगलं, नद्या नाले, महामार्ग वाटेत येणारी गावं असा प्रवास केलेली ही वाघिण भोरला पुन्हा आली. या परिक्रमेदरम्यानच्या काळात तिनं 500 किलोमीटरचा प्रवास केला. तिच्या गळ्यामध्ये रेडिओ कॉलर असल्यामुळे तिची प्रत्येक हालचाल वनविभागाचे अधिकारी टिपत आहेत. त्यातूनच जनावरांवरील हल्ल्यांसह दोन माणसांच्या मृत्युलाही हीच वाघिण जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. अखेर वनविभागानं नरभक्षक झालेल्या या वाघिणीला संपवण्याचा निर्णय घेतला.

वनविभागाच्या निर्णयाविरोधात केल्या गेलेल्या याचिकेमुळे तिचं आयुष्य काही काळ वाढलं, परंतु या सगळ्याचा थांगपत्ता नसलेल्या या वाघिणीला आता मात्र फार काळ मुक्त फिरता येणार नाही, कारण कुठल्याही क्षणी शिकाऱ्यांची गोळी तिचा वेध घेईल. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार या वाघिणीवर या 500 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान ठेवण्यात आलेली पाळत ही भारतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी पाळत ठरण्याची शक्यता आहे. 10 जुलै रोजी ब्रह्मपुरीच्या जंगलात या वाघिणीला पकडण्यात आले. माणसांवर हल्ला करायच्या तिच्या स्वभावामुळे तिला 29 जुलै रोजी बोरच्या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. या जंगलात अन्य वाघ नसल्यामुळे तिला पुरेसं खाद्य मिळेल आणि ती इथं राहू शकेल असा कयास होता. मात्र, इथं न थांबता या वाघिणीनं आपला संचार सुरू ठेवला, एवढंच नाही तर तिला पकडण्यासाठी जेसीबी, ट्रॉक्टर्स अन्य सामग्री घेऊन तयार असलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही तिनं धूळ चारली. निष्णात शिकाऱ्यांना गुंगारा देत या वाघिणीनं 500 किलोमीटरचा प्रदेश पालथा घातला. या प्रवासात जनावरांवर हल्ला करण्याबरोबरच दोन माणसांचा बळीही तिनं घेतला आहे.

मेळघाट किंवा मध्यप्रदेशातील जंगलांमध्ये ही वाघिण जाण्याची तज्ज्ञांची अपेक्षा होती. मात्र, तिथं जाण्यासाठी वाघिणीसाठी सुरक्षित मार्ग नसल्यामुळं ती गेली नसावी असा अंदाज बांधण्यात येतोय. या वाघिणीच्या या साहसी प्रवासामुळे वाघांच्या सीमा बदलत असल्याचे काही तज्ज्ञ म्हणत आहेत.  अर्थात, कारणं काही असोत, या नरभक्षक वाघिणीच्या नशीबात मात्र आता शिकाऱ्याची गोळी निश्चित झाल्यावर उच्च न्यायालयानं गुरुवारी शिक्कोमेर्तब केलं आहे.

टॅग्स :forestजंगलnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र