शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

भारतीय भाषांचं साहित्य संमेलन भरवण्यासाठी महाराष्ट्रानं पुढाकार घ्यावा - गुलजार

By admin | Published: January 16, 2016 1:25 PM

भारतातल्या सगळ्या भाषांचं एकत्र संमेलन व्हायला हवं अशी अपेक्षा करताना याकामी महाराष्ट्रानेच पुढाकार घ्यायला हवा असे आवाहनही गुलजार यांनी केलं.

ऑनलाइन लोकमत
ग्यानबा तुकाराम नगरी (पिंपरी चिंचवड) दि. १६ - साहित्य संमेलनं भरवणं, लेखकांनी, कवींनी, कलाकारांनी एकत्र येणं आणि वैचारीक देवाणघेवाण करणं ही केवळ महाराष्ट्रात घडणारी गोष्ट असल्याची कौतुकाची थाप ज्येष्ठ कवी गुलजार यांनी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना दिली. तसेच भारतातल्या सगळ्या भाषांचं एकत्र संमेलन व्हायला हवं अशी अपेक्षा करताना याकामी महाराष्ट्रानेच पुढाकार घ्यायला हवा असे आवाहनही गुलजार यांनी केलं.
मराठीतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादीत होत असल्याचे सांगताना अन्य भाषांमधील साहित्यही मराठीत येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज यांच्यामुळे मी मराठीच्या जवळ आल्याचे सांगताना मराठीतल्या अनेक उत्तमोत्तम कलाकृती अरूण शेवते यांच्या मदतीने मी उर्दूत व हिंदीत अनुवादीत केल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
लेखक हा मुक्त असतो, तो कुणाच्याही दबावापुढे झुकत नाही आणि त्यानं बंडखोरच रहावं असं गुलजार म्हणाले. ब्रह्मांडाचा आवाज एकवेळ गप्प होऊ शकतो, परंतु लेखकाचा नाही असं गुलजार म्हणाले. यासंदर्भात त्यांनी लेखकाची जीभ कापली तरी तो खोकल्यावर शब्दच बाहेर पडतात, त्यामुळे त्याची वाचा तुम्ही कधीही बंद करू शकत नाही या आशयाची कविता ऐकवली आणि उपस्थितांची मने जिंकली.