शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचं थैमान, 3750 जणांना लागण तर 381 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 16:21 IST

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे एकूण 3750 रुग्ण सापडले असून 381 जणांचा मृत्यू झाला आहे

ठळक मुद्देमहाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वाईन प्लूचे सर्वाधिक बळी सापडले आहेतमहाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे एकूण 3750 रुग्ण सापडले असून 381 जणांचा मृत्यू झाला आहेकेंद्र सरकारने 1 जानेवारीपासून ते 6 ऑगस्ट 2017 पर्यंत जमा केलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी जाहीर केली आहे

मुंबई, दि. 18 - देशभरात स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून अनेकजण या आजाराचे बळी पडले आहेत. स्वाईन फ्लूने देशभरात थैमान घातला असताना महाराष्ट्र आणि गुजरातमधील मृतांचा आकडा धक्कादायक आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वाईन प्लूचे सर्वाधिक बळी सापडले आहेत. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे एकूण 3750 रुग्ण सापडले असून 381 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून ते 6 ऑगस्ट 2017 पर्यंत जमा केलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी जाहीर केली आहे. 

कर्नाटकमध्ये 2805 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, तामिळनाडूत एकूण 2956 रुग्ण सापडले आहेत. मात्र येथील रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत असल्याचं दिसत आहे. येथील फक्त 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 

गुजरातमध्ये स्वाईन फ्लूची लागण झालेल्यांची संख्या इतर राज्यांशी तुलना करता फार कमी आहे. गुजरातमध्ये फक्त 903 केसेस समोर आली आहेत. मात्र मृतांचा आकडा जास्त असून एकूण 138 जणांचा बळी गेला आहे. तेलंगणामध्ये 1493 तर केरळमध्ये 1317 स्वाईन फ्लूच्या केसेस समोर आल्या आहेत. मृतांच्या आकडेवारीत महाराष्ट्रानंतर गुजरातचा क्रमांक लागला आहे. यामुळे राज्याच्या आरोग्य योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. स्वाईन फ्लू रोखण्यासाठी आणि तो झाल्यास मिळणा-या उपचारांची कमतरता महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 

या तुलनेत दिल्लीमध्ये स्वाईन फ्लूचे 928 रुग्ण सापडले असून, फक्त चार जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वाईन फ्लूमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्येही महाराष्ट्र आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर होते. महाराष्ट्रात एकूण 8583 केसेस सापडल्या होत्या, ज्यामधील 905 जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्र त्यावेळी पहिल्या क्रमांकावर होता. गुजरातमध्ये 7180 केसेस समोर आल्या होत्या, तर 517 जणांचा मृत्यू झाला होता. गुजरातनंतर राजस्थानमधील मृतांचा आकडा सर्वात जास्त होता. राजस्थानमध्ये 472 जणांचा बळी गेला होता. 

स्वाइन फ्लूची लक्षणे - स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश फॅ. पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.

आपणास फ्लू किंवा साधी सर्दी झाली आहे हे कसे ओळखावे?फ्लू किंवा साधी सर्दी ओळखण्यासाठी एक खूण आपणास उपयोगी पडते. आपणास फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ आगोदर दिसतात. तसेच ही लक्षणे अधिक तेव्र स्वरुपाचे असतात. जर फ्लू झाला असेल तर आपणास दोन ते तिन आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.

स्वाइन फ्लूचा प्रसार कसा होतो?नव्या स्वैअन फ्लू विषाणूं तीव्र संसर्ग पसरवतात, याचा प्रसार माणसापासून माणसाला होतो. स्वाइन फ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणा-या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरुपात जिवंत राहतात. श्वसन करताना नाकातून किंवा तोंडावाटे याचा संसर्ग होऊ शकतो. तसेच अशा बाधित व्यक्तीच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणा-या कफ हातावर लागल्यास त्यानंतर तो व्यक्ती जिथे जिथे स्पर्ष करेल तिथे तिथे संसर्ग होऊ शकतो.

दक्षता कशी घ्यावी?असे लोक जे खूप आजारी आहेत व ज्यांना स्वाइन फ्लू असण्याची शक्यता आहेत अशांना प्रतिबंधात्मक औषधे दिली जाऊ शकतात व त्यातून काही प्रमाणात बचाव होऊ शकतो. अशी औषधे ७०% ते ९०% प्रभावी ठरतात. पण ह्या औषधांचावापर डॉक्टर व त्या व्यक्तीच्या आजाराच्या स्वरुपावर अवलंबून असतात.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार