शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

'साहेबांनी आमदार निवडून आणायचे, पावसात भिजायचं अन् तुम्ही...' आव्हाडांचे बंडखोरांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 18:48 IST

'पक्षाचा प्रतोद म्हणून मी जो व्हिप काढेन, तो त्यांनाही लागू होईल.'

Maharashtra Politics: आज राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोडपती निवड केली. यानंतर अव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांसह बंड करणाऱ्या सर्व नेत्यांवर सडकून टीका केली.

आव्हाड म्हणाले, 'माझ्या भूमिकेवर शरद पवारांनी नेहमी प्रेम केले आहे. शोषितांच्या बाजूने उभे राहणाऱ्या चेहऱ्याला पवारांनी विरोधी पक्षनेता केलं आहे. कुणी आपल्याला अवघड स्थितीमध्ये आपल्याला टाकलंय, म्हणून त्या स्थितीकडे पाहायचं नाही. त्या स्थितीला एक संधी म्हणून पाहायचं. माझ्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते फक्त शरद पवार आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, पक्ष आणि निशानी कुणीच घेऊ शकणार नाही. 6 तारखेला बैठक होती, त्याच्या आधीच एवढी घाई. बैठकीत सांगितलं असतं की, आम्ही असं करणार आहेत, तर साहेब म्हणाले असते ठीक आहे, करा. बैठक ठेऊन अशी गोष्ट करणे, याला काय म्हणायचे. पवारांनी दोन नेत्यांची नावे घेतली, त्यांच्याविरोधात कारवाई होणार आहे,' असं आव्हाड म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांकडे आहे आणि पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. जयंत पाटलांनी माझी प्रतोड आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. प्रतोद म्हणून मी जो व्हिप काढेन, तो त्यांनाही लागू होईल. शरद पवारांमुळे यांनी 25-25 वर्षे मंत्रिपदे उपभोगली, अजून तुम्हाला काय हवंय? ज्या नेत्याने मेहनतीची पराकाष्ट केली, ज्यांनी तुम्हाला महसूलमंत्री, अर्थमंत्री केलं, ज्यांनी सगळी समृद्धी दिली, सगळे मानसन्मान मिळवून दिले, अशा माणसाला त्याच्या अखेरच्या वयात अशा परिस्थितीत टाकणे माणुसकिला शोभणारे नाही.' 

'मला कुणी विचारणार नव्हतं आणि मला कुणी विचारणारही नाही. मी मेलो तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही. काही जणांचे घरचे, नातेवाईक, गावातले लोक फोन करत आहेत. मतदारसंघात उद्रेक व्हायला सुरुवात झाली आहे. सगळं आरामात चालू आहे, असं नाही. लोकांना हे सहन होत नाहीये. शरद पवारांचे विरोधकही म्हणतात, ज्या माणसाने या लोकांना एकहाती मोकळं मैदान दिलं, त्या माणसाला तुम्ही काय दिलं. तुम्ही चार आमदार निवडून आणले का? त्यांनी आमदार निवडून आणायचे, त्यांनी पावसात भिजायचं, त्यांनी आजारपणात सगळी भाषणं करायची आणि तुम्हाला मंत्रालयात बसण्याची संधी द्यायची. एखाद्या पोराने म्हाताऱ्या बापाला बाहेर काढावं, आपण एवढं निष्ठूर, संवेदना विसरलेली माणसं झाले आहोत. जे एकनाथ शिंदे म्हणत होते, अजित पवारांनी निधी दिला नाही, तेच शिंदे अजित पवारांचे स्वागत करत आहेत. इतका विरोधाभास महाराष्ट्राने पाहिला नाही,' असंही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष