शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

'साहेबांनी आमदार निवडून आणायचे, पावसात भिजायचं अन् तुम्ही...' आव्हाडांचे बंडखोरांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 18:48 IST

'पक्षाचा प्रतोद म्हणून मी जो व्हिप काढेन, तो त्यांनाही लागू होईल.'

Maharashtra Politics: आज राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोडपती निवड केली. यानंतर अव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांसह बंड करणाऱ्या सर्व नेत्यांवर सडकून टीका केली.

आव्हाड म्हणाले, 'माझ्या भूमिकेवर शरद पवारांनी नेहमी प्रेम केले आहे. शोषितांच्या बाजूने उभे राहणाऱ्या चेहऱ्याला पवारांनी विरोधी पक्षनेता केलं आहे. कुणी आपल्याला अवघड स्थितीमध्ये आपल्याला टाकलंय, म्हणून त्या स्थितीकडे पाहायचं नाही. त्या स्थितीला एक संधी म्हणून पाहायचं. माझ्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते फक्त शरद पवार आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, पक्ष आणि निशानी कुणीच घेऊ शकणार नाही. 6 तारखेला बैठक होती, त्याच्या आधीच एवढी घाई. बैठकीत सांगितलं असतं की, आम्ही असं करणार आहेत, तर साहेब म्हणाले असते ठीक आहे, करा. बैठक ठेऊन अशी गोष्ट करणे, याला काय म्हणायचे. पवारांनी दोन नेत्यांची नावे घेतली, त्यांच्याविरोधात कारवाई होणार आहे,' असं आव्हाड म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांकडे आहे आणि पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. जयंत पाटलांनी माझी प्रतोड आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. प्रतोद म्हणून मी जो व्हिप काढेन, तो त्यांनाही लागू होईल. शरद पवारांमुळे यांनी 25-25 वर्षे मंत्रिपदे उपभोगली, अजून तुम्हाला काय हवंय? ज्या नेत्याने मेहनतीची पराकाष्ट केली, ज्यांनी तुम्हाला महसूलमंत्री, अर्थमंत्री केलं, ज्यांनी सगळी समृद्धी दिली, सगळे मानसन्मान मिळवून दिले, अशा माणसाला त्याच्या अखेरच्या वयात अशा परिस्थितीत टाकणे माणुसकिला शोभणारे नाही.' 

'मला कुणी विचारणार नव्हतं आणि मला कुणी विचारणारही नाही. मी मेलो तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही. काही जणांचे घरचे, नातेवाईक, गावातले लोक फोन करत आहेत. मतदारसंघात उद्रेक व्हायला सुरुवात झाली आहे. सगळं आरामात चालू आहे, असं नाही. लोकांना हे सहन होत नाहीये. शरद पवारांचे विरोधकही म्हणतात, ज्या माणसाने या लोकांना एकहाती मोकळं मैदान दिलं, त्या माणसाला तुम्ही काय दिलं. तुम्ही चार आमदार निवडून आणले का? त्यांनी आमदार निवडून आणायचे, त्यांनी पावसात भिजायचं, त्यांनी आजारपणात सगळी भाषणं करायची आणि तुम्हाला मंत्रालयात बसण्याची संधी द्यायची. एखाद्या पोराने म्हाताऱ्या बापाला बाहेर काढावं, आपण एवढं निष्ठूर, संवेदना विसरलेली माणसं झाले आहोत. जे एकनाथ शिंदे म्हणत होते, अजित पवारांनी निधी दिला नाही, तेच शिंदे अजित पवारांचे स्वागत करत आहेत. इतका विरोधाभास महाराष्ट्राने पाहिला नाही,' असंही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष