शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार कामाला लागले, बुधवारी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 20:12 IST

Maharashtra Politics: 'आमदारांना कशावर सह्या घेतल्या, याची माहिती नव्हती. अनेकजण संपर्कात आहेत.'

Maharashtra Politics: आज महाराष्ट्रातील नागरिकांना पुन्हा एकदा मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बंडखोरी करत आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोरांवर जोरदार टीका केली. 

पाटील म्हणतात, 'आज तुम्ही जे पाहिलं तेच आम्ही पाहिलं. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत आहोत. आज शपथविधीला ज्यांना बोलावण्यात आले होते, त्यांना कशावर सह्या घेतल्या माहिती नव्हती. तिथे होते ते आमदार शरद पवारांसोबत बोलले आहेत. काही जण माझ्यासोबत बोलले आहेत. काही आमदार संभ्रमात होते मात्र आता स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत,' असं जयंत पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'आजच्या कृतीला शरद पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. 5 तारखेला राष्ट्रवादी पक्षाचे राज्यस्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, तालुका प्रतिनिधी या सर्वांना दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी बोलावलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरला या बैठकीचं आयोजन केले आहे. या बैठकीत शरद पवार आपली भूमिका अधिक स्पष्ट करतील,' असंही पाटील म्हणाले.

'ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांना बरीच मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. ही आश्वासने नेमकी काय आहेत, हे योग्य वेळी सांगू. आठ जणांची काही वेगळी भूमिका होती, ते सतत मांडत होते. ईडी चौकशी दरम्यान, मला निरोप आला का? तो विषय वेगळा आहे, मी नंतर त्यावर भाष्य करणार आहे.' बंडखोरांवर कारवाई करण्याबाबत जयंत पाटील यांनी म्हटले की, 'दुपारच्या घटनाक्रमानंतर कायदेशीर बाबींवर विचार करण्यास संधी मिळाली नाही. कारवाई संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ पुढील निर्णय घेऊ.'

ते पुढे म्हणाले की, 'राज्यात आणखी एक पक्ष फोडण्याचे काम भाजपने केले आहे. सत्तेत असताना आणि बहुमताची गरज नसतानाही विरोधी पक्ष फोडला. आधी शिवसेना फोडली, त्यांचा लढा सुप्रिम कोर्टात गेला. कोर्टाने काय निर्णय दिला ते सर्वांना माहित आहे. राज्यात पुन्हा असं घडेल असं वाटल नव्हत. देशात नऊ राज्य आहेत, जिथे विरोधी पक्ष फोडण्याचे काम होत आहे. विरोधकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. ऑपरेशन लोटस हे भाजपचे चिन्ह आहे,' अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष