शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शरद पवार कामाला लागले, बुधवारी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 20:12 IST

Maharashtra Politics: 'आमदारांना कशावर सह्या घेतल्या, याची माहिती नव्हती. अनेकजण संपर्कात आहेत.'

Maharashtra Politics: आज महाराष्ट्रातील नागरिकांना पुन्हा एकदा मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बंडखोरी करत आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोरांवर जोरदार टीका केली. 

पाटील म्हणतात, 'आज तुम्ही जे पाहिलं तेच आम्ही पाहिलं. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत आहोत. आज शपथविधीला ज्यांना बोलावण्यात आले होते, त्यांना कशावर सह्या घेतल्या माहिती नव्हती. तिथे होते ते आमदार शरद पवारांसोबत बोलले आहेत. काही जण माझ्यासोबत बोलले आहेत. काही आमदार संभ्रमात होते मात्र आता स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत,' असं जयंत पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'आजच्या कृतीला शरद पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. 5 तारखेला राष्ट्रवादी पक्षाचे राज्यस्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, तालुका प्रतिनिधी या सर्वांना दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी बोलावलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरला या बैठकीचं आयोजन केले आहे. या बैठकीत शरद पवार आपली भूमिका अधिक स्पष्ट करतील,' असंही पाटील म्हणाले.

'ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांना बरीच मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. ही आश्वासने नेमकी काय आहेत, हे योग्य वेळी सांगू. आठ जणांची काही वेगळी भूमिका होती, ते सतत मांडत होते. ईडी चौकशी दरम्यान, मला निरोप आला का? तो विषय वेगळा आहे, मी नंतर त्यावर भाष्य करणार आहे.' बंडखोरांवर कारवाई करण्याबाबत जयंत पाटील यांनी म्हटले की, 'दुपारच्या घटनाक्रमानंतर कायदेशीर बाबींवर विचार करण्यास संधी मिळाली नाही. कारवाई संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ पुढील निर्णय घेऊ.'

ते पुढे म्हणाले की, 'राज्यात आणखी एक पक्ष फोडण्याचे काम भाजपने केले आहे. सत्तेत असताना आणि बहुमताची गरज नसतानाही विरोधी पक्ष फोडला. आधी शिवसेना फोडली, त्यांचा लढा सुप्रिम कोर्टात गेला. कोर्टाने काय निर्णय दिला ते सर्वांना माहित आहे. राज्यात पुन्हा असं घडेल असं वाटल नव्हत. देशात नऊ राज्य आहेत, जिथे विरोधी पक्ष फोडण्याचे काम होत आहे. विरोधकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. ऑपरेशन लोटस हे भाजपचे चिन्ह आहे,' अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष