शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार", संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 16:01 IST

''शपथविधीवेळी शिंदे गटाचे नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. आता कोणतीही पळवाट त्यांना वाचवू शकत नाही.''

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांचे सर्व आमदार अपात्र ठरणार आणि राज्याला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घटली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपध घेतली. म्हणजेच आता राष्ट्रवादीदेखील सत्तेत सामील झाली आहे. यावरुन संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संजय राऊत?

यावेळी संजय राऊत म्हणाले, "मी याला भूकंप वैगरे मानत नाही. काही गोष्टी या राजकारणात घडणार होत्या, त्या आज घडल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की, जे सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार आहे, ते अस्थिर आहे. 165 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा ते करतात, पण त्यांना अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची गरज लागते. याचा अर्थ मी असा काढतो की, सर्वोच्च न्यायालयाने शिंदेगटाबाबत निवाडा दिला आहे, घटनाबाह्य सरकार म्हटले आहे, ते योग्य आहे. "

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत"आजच्या शपथविधीचा अर्थ म्हणजे एकनाथ शिंदेंसह प्रथम 16 आणि नंतर सर्व आमदार अपात्र ठरणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाण्याची सुरुवात झाली आहे. यामुळेच भाजपने आता हे नवीन टेकू घेतलं आहे. कोणावर काय आरोप, काय खटले सुरू होते, यात मला पडायचे नाही. पण, यातले अनेक लोक असे आहेत, ज्यांच्याविरोधात भाजपने मोहिम राबवली होती. त्यांचे आता भाजप काय करणार, हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे फारकाळ मुख्यमंत्रिपदावर राहत नाहीत, त्यांचे आमदारही अपात्र ठरतील, हे आजच्या शपथविधीवरुन स्पष्ट होते," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

आम्ही पुन्हा जोमाने उभं राहूते पुढे म्हणाले की, "माझं शरद पवारांशी बोलणं झालं आहे, ते खंबीर आहेत. उद्धव ठाकरेंनीदेखील शरद पवारांशी चर्चा केली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते, आम्ही पुन्हा उभं राहू. राज्यातल्या लोकांचा या सगळ्यांना अजिबात पाठींबा नाही. जे शिवसेनेच्या बाबतीत घडवलं गेलं, राष्ट्रवादीच्या बाबतीत घडवंल गेलं, त्याला जनता पाठींबा देणार नाही."

राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार"गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, हा विस्तार शिंदेंच्या वेळेस व्हायला हवा होता. पण, आज या शपथविधीवरुन वेगळाच अर्थ निघतोय. अजित पवारांसह इतर नेत्यांच्या शपथविधीवेळी शिंदे गटाचे नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. त्यांच्या वेदना मी समजू शकतो. पण, आता कोणतीही पळवाट त्यांना वाचवू शकत नाही. या राज्याला परत एक नवा मुख्यमंत्री मिळू शकतो," असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष