शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार", संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 16:01 IST

''शपथविधीवेळी शिंदे गटाचे नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. आता कोणतीही पळवाट त्यांना वाचवू शकत नाही.''

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांचे सर्व आमदार अपात्र ठरणार आणि राज्याला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घटली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपध घेतली. म्हणजेच आता राष्ट्रवादीदेखील सत्तेत सामील झाली आहे. यावरुन संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संजय राऊत?

यावेळी संजय राऊत म्हणाले, "मी याला भूकंप वैगरे मानत नाही. काही गोष्टी या राजकारणात घडणार होत्या, त्या आज घडल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की, जे सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार आहे, ते अस्थिर आहे. 165 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा ते करतात, पण त्यांना अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची गरज लागते. याचा अर्थ मी असा काढतो की, सर्वोच्च न्यायालयाने शिंदेगटाबाबत निवाडा दिला आहे, घटनाबाह्य सरकार म्हटले आहे, ते योग्य आहे. "

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत"आजच्या शपथविधीचा अर्थ म्हणजे एकनाथ शिंदेंसह प्रथम 16 आणि नंतर सर्व आमदार अपात्र ठरणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाण्याची सुरुवात झाली आहे. यामुळेच भाजपने आता हे नवीन टेकू घेतलं आहे. कोणावर काय आरोप, काय खटले सुरू होते, यात मला पडायचे नाही. पण, यातले अनेक लोक असे आहेत, ज्यांच्याविरोधात भाजपने मोहिम राबवली होती. त्यांचे आता भाजप काय करणार, हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे फारकाळ मुख्यमंत्रिपदावर राहत नाहीत, त्यांचे आमदारही अपात्र ठरतील, हे आजच्या शपथविधीवरुन स्पष्ट होते," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

आम्ही पुन्हा जोमाने उभं राहूते पुढे म्हणाले की, "माझं शरद पवारांशी बोलणं झालं आहे, ते खंबीर आहेत. उद्धव ठाकरेंनीदेखील शरद पवारांशी चर्चा केली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते, आम्ही पुन्हा उभं राहू. राज्यातल्या लोकांचा या सगळ्यांना अजिबात पाठींबा नाही. जे शिवसेनेच्या बाबतीत घडवलं गेलं, राष्ट्रवादीच्या बाबतीत घडवंल गेलं, त्याला जनता पाठींबा देणार नाही."

राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार"गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, हा विस्तार शिंदेंच्या वेळेस व्हायला हवा होता. पण, आज या शपथविधीवरुन वेगळाच अर्थ निघतोय. अजित पवारांसह इतर नेत्यांच्या शपथविधीवेळी शिंदे गटाचे नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. त्यांच्या वेदना मी समजू शकतो. पण, आता कोणतीही पळवाट त्यांना वाचवू शकत नाही. या राज्याला परत एक नवा मुख्यमंत्री मिळू शकतो," असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष