शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
2
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
4
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
5
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
6
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
7
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
8
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
9
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
10
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
11
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
12
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
13
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
14
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
15
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
16
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
17
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
18
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
19
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
20
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांनी साद घातली तर प्रतिसाद देणार', ठाकरेंकडे परतण्याबाबत शंभूराज देसाईंचे मोठे विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 20:04 IST

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे.

Maharashtra Political Crisis News: राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या येण्याने भाजपसोबत असलेला शिंदे गट (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा आहे. यातच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

2019 मध्ये राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळवून दिले. पण, काही घटना अशा घडल्या की, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यानंतर, गेल्यावर्षी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रामुख्याने अजित पवारांवर टीका करत बंड केले आणि भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. या सरकारला काही दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झाले. पण, आता कट्टर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसही सरकारमध्ये सामील झाली आहे. यामुळे शिंदे गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. 

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले की, जर उद्धव ठाकरे यांनी बोलावले, तर त्यांच्याकडे परत जाल का? यावर ते म्हणाले की, "हा जर तरचा प्रश्न आहे. ज्यावेळी त्यांच्याकडून हाक येईल तेव्हा साद दिली जाईल. त्यांच्याकडून तशी साद आली तर आम्हीही सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ. जर तुम्हाला कोणी साद घातली की आपण एकदम धुडकाऊन लावत नाही. याबाबत विचार करणारा मी एकटा नाही. पक्षाचे नेते मंडळी, वरिष्ठ मंडळी आहेत," असे मोठे विधान शंभुराज देसाई यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात आपल्याला नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष