शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

'त्यांनी साद घातली तर प्रतिसाद देणार', ठाकरेंकडे परतण्याबाबत शंभूराज देसाईंचे मोठे विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 20:04 IST

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे.

Maharashtra Political Crisis News: राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या येण्याने भाजपसोबत असलेला शिंदे गट (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा आहे. यातच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

2019 मध्ये राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळवून दिले. पण, काही घटना अशा घडल्या की, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यानंतर, गेल्यावर्षी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रामुख्याने अजित पवारांवर टीका करत बंड केले आणि भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. या सरकारला काही दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झाले. पण, आता कट्टर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसही सरकारमध्ये सामील झाली आहे. यामुळे शिंदे गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. 

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले की, जर उद्धव ठाकरे यांनी बोलावले, तर त्यांच्याकडे परत जाल का? यावर ते म्हणाले की, "हा जर तरचा प्रश्न आहे. ज्यावेळी त्यांच्याकडून हाक येईल तेव्हा साद दिली जाईल. त्यांच्याकडून तशी साद आली तर आम्हीही सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ. जर तुम्हाला कोणी साद घातली की आपण एकदम धुडकाऊन लावत नाही. याबाबत विचार करणारा मी एकटा नाही. पक्षाचे नेते मंडळी, वरिष्ठ मंडळी आहेत," असे मोठे विधान शंभुराज देसाई यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात आपल्याला नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष