शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Maharashtra Politics : सूर जुळले! देवेंद्र फडणवीस यांचं 'सामना'तून कौतुक; चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:48 IST

Maharashtra Politics : आज दै. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) :   १ जानेवारी २०२५ रोजी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पालकमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै.सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  कौतुक करण्यात आले आहे. "बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुकास पात्र आहेत", असं कौतुक सामनाच्या अग्रलेखातून केले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सामनाचे आभार मानले आहेत. 

... तर तुझा दुसरा मस्साजोगचा संतोष देशमुख करू; अवैध धंदेवाल्यांच्या सरपंच पतीला धमक्या, मारहाण करत लुटले

"नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोली 'पोलाद सिटी' ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असलील तर त्याचे स्वागत करायला हवे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीचा विकासाचा विडा आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठी उटलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंनी घ्यावी लागेल.  तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत, असंही सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? 

दरम्यान,आता सामनाच्या अग्रलेखावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. बावनकुळे यांनी सामनाचे आभार मानले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमच्याकडे आज आनंदाचा दिवस आहे. अनेक दिवसापासून आम्ही सामनातून चांगलं लिहिन्याची वाट बघत होतो. यापूर्वीच त्यांना चांगले लिहिता आले असते. आज देवेंद्रजींना महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता गडचिरोली असतील. नक्षलवाद संपवण्याचे असेल. किमान सामनातून देवेंद्र फडणीस यांचे कौतुक होणे हे आमच्यासाठी विकसित महाराष्ट्र घेऊन जात आहे याकरता आनंदाची गोष्ट आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

"याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. तेव्हाही सामना कौतुक करेल याची प्रतिक्षा होती, पण ठिक आहे उशीरा केले यासाठी धन्यावाद, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.    

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत