शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 08:18 IST

Maharashtra Politics : काल भाजपाच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं.

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपानेही मोठी तयारी केली, काल मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं. 'विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करून २०२९ मध्ये मात्र भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत येईल', असं विधान शाह यांनी केलं. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका

काल मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शाह यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकांबाबत सूचना दिल्या. शाह ( Amit Shah ) यांनी मुंबईतील पक्षांतर्गत लहानमोठे वाद तातडीने मिटवा, एकत्र बसा असा आदेश दिला. आज मी जे सांगतो आहे ते लिहून घ्या आणि त्यानुसार वागा असा सल्लाही त्यांनी दिला. मुंबई भाजपमधील  ( BJP ) गटबाजीचा थेट उल्लेख न करता त्यांनी कानउघाडणी केली.

केंद्रीय मंत्री शाह यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, सगळ्यांनाच आपला पक्ष वाढवायचा आहे. पण, महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार येऊ शकत नाही. राज्याची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचे सरकार येऊ शकतं, मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. १९८५ नंतर  चाळीस वर्षात राज्यात एका पक्षाचे सरकार कधीच आलं नाही, असंही अजित पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, २०२४ मध्ये महायुतीचे सरकार येईल. २०२९ ला अजून वेळ आहे, अशी एका वाक्यात सीएम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 

आमदार जयंत पाटील काय म्हणाले?

जयंत पाटील म्हणाले, हरियाणा, जम्मू-कश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. पण भाजपाच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन बसण्याची वेळ आली, म्हणजेच महाराष्ट्रात किती मोठा खड्डा पडला आहे हे दिसते. २०२४ मध्ये तर आपण निवडून येणार नाही म्हणूनच २०२९ चे विधान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून केले जात आहे, असा टोला जयंत पाटील यांनी शाह यांचे नाव न घेता लगावला.  ( Maharashtra Politics )

टॅग्स :Amit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र