शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 08:18 IST

Maharashtra Politics : काल भाजपाच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं.

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपानेही मोठी तयारी केली, काल मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं. 'विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करून २०२९ मध्ये मात्र भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत येईल', असं विधान शाह यांनी केलं. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका

काल मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शाह यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकांबाबत सूचना दिल्या. शाह ( Amit Shah ) यांनी मुंबईतील पक्षांतर्गत लहानमोठे वाद तातडीने मिटवा, एकत्र बसा असा आदेश दिला. आज मी जे सांगतो आहे ते लिहून घ्या आणि त्यानुसार वागा असा सल्लाही त्यांनी दिला. मुंबई भाजपमधील  ( BJP ) गटबाजीचा थेट उल्लेख न करता त्यांनी कानउघाडणी केली.

केंद्रीय मंत्री शाह यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, सगळ्यांनाच आपला पक्ष वाढवायचा आहे. पण, महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार येऊ शकत नाही. राज्याची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचे सरकार येऊ शकतं, मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. १९८५ नंतर  चाळीस वर्षात राज्यात एका पक्षाचे सरकार कधीच आलं नाही, असंही अजित पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, २०२४ मध्ये महायुतीचे सरकार येईल. २०२९ ला अजून वेळ आहे, अशी एका वाक्यात सीएम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 

आमदार जयंत पाटील काय म्हणाले?

जयंत पाटील म्हणाले, हरियाणा, जम्मू-कश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. पण भाजपाच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन बसण्याची वेळ आली, म्हणजेच महाराष्ट्रात किती मोठा खड्डा पडला आहे हे दिसते. २०२४ मध्ये तर आपण निवडून येणार नाही म्हणूनच २०२९ चे विधान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून केले जात आहे, असा टोला जयंत पाटील यांनी शाह यांचे नाव न घेता लगावला.  ( Maharashtra Politics )

टॅग्स :Amit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र