शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 08:18 IST

Maharashtra Politics : काल भाजपाच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं.

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपानेही मोठी तयारी केली, काल मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं. 'विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करून २०२९ मध्ये मात्र भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत येईल', असं विधान शाह यांनी केलं. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका

काल मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शाह यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकांबाबत सूचना दिल्या. शाह ( Amit Shah ) यांनी मुंबईतील पक्षांतर्गत लहानमोठे वाद तातडीने मिटवा, एकत्र बसा असा आदेश दिला. आज मी जे सांगतो आहे ते लिहून घ्या आणि त्यानुसार वागा असा सल्लाही त्यांनी दिला. मुंबई भाजपमधील  ( BJP ) गटबाजीचा थेट उल्लेख न करता त्यांनी कानउघाडणी केली.

केंद्रीय मंत्री शाह यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, सगळ्यांनाच आपला पक्ष वाढवायचा आहे. पण, महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार येऊ शकत नाही. राज्याची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचे सरकार येऊ शकतं, मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. १९८५ नंतर  चाळीस वर्षात राज्यात एका पक्षाचे सरकार कधीच आलं नाही, असंही अजित पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, २०२४ मध्ये महायुतीचे सरकार येईल. २०२९ ला अजून वेळ आहे, अशी एका वाक्यात सीएम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 

आमदार जयंत पाटील काय म्हणाले?

जयंत पाटील म्हणाले, हरियाणा, जम्मू-कश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. पण भाजपाच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन बसण्याची वेळ आली, म्हणजेच महाराष्ट्रात किती मोठा खड्डा पडला आहे हे दिसते. २०२४ मध्ये तर आपण निवडून येणार नाही म्हणूनच २०२९ चे विधान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून केले जात आहे, असा टोला जयंत पाटील यांनी शाह यांचे नाव न घेता लगावला.  ( Maharashtra Politics )

टॅग्स :Amit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र