शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:37 IST

आम्हाला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कायम ठेवायची आहे. गुंडगिरी करून सत्ता काबीज करण्याला आमचा विरोध आहे.

मुंबई - शिवसेनेने त्यांचा गटनेता बदलला आहे. उद्या बहुमत चाचणीवेळी व्हिप जारी होईल मग हे प्रकरण कोर्टात आहे. एका रात्रीत राज्यपाल भवनाने बहुमत चाचणीसाठी पत्र दिले. ११ जुलैपर्यंत कोर्टाने म्हणणं मांडण्याची मुदत दिली. मग ४८ तासात बहुमत चाचणी का? हा चमत्कार आहे. लोकशाही, संविधानविरोधी काम राजभवनाकडून केले जाते असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. 

नाना पटोले म्हणाले की, शिवसेना कोर्टात गेली आहे. तीच भूमिका काँग्रेसची आहे. सध्या आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. ज्याच्याजवळ बहुमत असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. राज्यपाल भाजपाचा अजेंडा महाराष्ट्रात राबवत आहेत. शिवसेनेचा गटनेता वेगळा आहे. हे बंडखोर गटाला मान्य नाही. विधानसभा हा आखाडा नाही. सुप्रीम कोर्टाने ११ जुलैपर्यंत वेळ दिलीय. वाट न बघता मध्येच ही चाचणी घेणे कुठल्या संविधानिक चौकटीत येते याचं उत्तर मिळणं गरजेचे आहे. 

तसेच आम्हाला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कायम ठेवायची आहे. गुंडगिरी करून सत्ता काबीज करण्याला आमचा विरोध आहे. सत्तेपेक्षा राज्यात स्थिरता राहणं गरजेचे आहे. विरोधात बसायला आम्हाला काहीही अडचण नाही. भाजपा-शिवसेनेत बेबनाव झाला नसता तर हे सरकार आले नसते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. सुखदुखात सोबत राहायचं ही प्रामाणिक भूमिका आहे. ज्याच्याशी मैत्री करायची ही प्रामाणिक करायची असंही नाना पटोले म्हणाले. 

सोनिया गांधींचाउद्धव ठाकरेंना फोन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून धीर दिला. आम्ही सोबत आहोत, घाबरण्यासारखं काही नाही. वेळ आल्यास तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ असंही सांगितले आहे. शिवसेनेत स्थिरता राहावी असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. २०१९ मध्ये लोकांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचं कौल दिला. परंतु त्यानंतर घडलेल्या घडामोडीत काँग्रेस सत्तेत आले. आमची विरोधात बसण्याची तयारी आहे असंही नाना पटोलेंनी सांगितले. बंडखोर आमदार अजूनही आम्ही शिवसेनेचे आहोत सांगतायेत. शिवसेनेचे आमदार सभागृहात आल्यानंतर भूमिका बदलू शकते. ही अग्निपरीक्षा बंडखोर आमदारांची आहे असंही पटोले म्हणाले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ