शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 11:53 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे.

अत्यंत नाट्यमय घडामोडी घडून काल अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेत सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आपल्याला ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे मानले जात आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील  मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. ज्या पक्षाचे अधिक सदस्य त्यांचा विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेता घोषित केला आहे, त्याबाबत तुमचं काय मत आहे, असं विचारलं असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशा प्रकारे विरोधी पक्ष नेता जाहीर करता येत नाही. शेवटी ज्यांचं विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. आमदार जास्त आहेत. त्यांचाच विरोधी पक्षनेता होतो. याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल. तसेच सध्या काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता व्हायला हवा, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगिलते. 

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसचे सदस्य तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही, उलट महाविकास आघाडीमधील वज्रमुठ अधिक पक्की होणार, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबाबत बाळासाहेब थोरात यांनी काल चिंता व्यक्त केली होती. थोरात म्हणाले होते की, २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी असल्याची खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. तसेच राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याचेही ते म्हणााले होते.  

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष