शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 11:53 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे.

अत्यंत नाट्यमय घडामोडी घडून काल अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेत सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आपल्याला ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे मानले जात आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील  मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. ज्या पक्षाचे अधिक सदस्य त्यांचा विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेता घोषित केला आहे, त्याबाबत तुमचं काय मत आहे, असं विचारलं असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशा प्रकारे विरोधी पक्ष नेता जाहीर करता येत नाही. शेवटी ज्यांचं विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. आमदार जास्त आहेत. त्यांचाच विरोधी पक्षनेता होतो. याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल. तसेच सध्या काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता व्हायला हवा, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगिलते. 

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसचे सदस्य तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही, उलट महाविकास आघाडीमधील वज्रमुठ अधिक पक्की होणार, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबाबत बाळासाहेब थोरात यांनी काल चिंता व्यक्त केली होती. थोरात म्हणाले होते की, २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी असल्याची खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. तसेच राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याचेही ते म्हणााले होते.  

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष