शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Narhari Jhariwal: सत्तासंघर्षाच्या निकालाचा दिवस, पण सर्वांचं लक्ष असलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 09:00 IST

Maharashtra Politics Crisis Eknath vs Uddhav Thackeray News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

गेल्या ११ महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये आजचा ११ मे हा दिवस निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेत पडलेली फूट, महाविकास आघाडी सरकारचं पतन, एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांची अपात्रता या मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार आहे. त्यामुळे सत्ताधारी शिंदे-भाजपा सरकारसह राज्य आणि देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागलं आहे. मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाले आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ येत आहेत. तसेच ते नाशिकमधील दिंडोरी येथील त्यांच्या गावी नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तसेच गावातील नागरिकांनीही ते कुठे असल्याचे माहित नसल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाचा निकाल लागत असतानाच नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्यानंतर झिरवळ हे त्यांच्या गावी असल्याचे झिरवळ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काल सुनावणीदरम्यान ही माहिती दिली होती. गुरुवारचा दिवस भरगच्च कामकाजाचा असेल, असे समलैंगिक विवाह प्रकरणावरील बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना सांगितले. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल न्या. चंद्रचूड यांनी लिहिलेला, तसेच सर्व न्यायाधीशांची सहमती लाभलेला ५-०, असा सर्वसंमतीचा असेल, असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, काल प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी सांगितलं होतं की, मी जो काही निकाल दिला होता तो कुठल्याही आकसाने दिला नव्हता. सार्वभौम सभागृह आहे,. ते घटनेवर चालतं. त्या पद्धतीने मी योग्य तो निर्णय दिला होता. त्यामुळे न्यायदेवता माझ्या निर्णयाचा निश्चितच विचार करेल. तसेच तत्कालीन अध्यक्ष मी होतो. अपात्रतेचा निर्णय हा माझ्याकडेच येईल, असा विश्वासही झिरवळ यांनी व्यक्त केला होता. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNarhari Jhariwalनरहरी झिरवाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदे