शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Narhari Jhariwal: सत्तासंघर्षाच्या निकालाचा दिवस, पण सर्वांचं लक्ष असलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 09:00 IST

Maharashtra Politics Crisis Eknath vs Uddhav Thackeray News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

गेल्या ११ महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये आजचा ११ मे हा दिवस निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेत पडलेली फूट, महाविकास आघाडी सरकारचं पतन, एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांची अपात्रता या मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार आहे. त्यामुळे सत्ताधारी शिंदे-भाजपा सरकारसह राज्य आणि देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागलं आहे. मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाले आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ येत आहेत. तसेच ते नाशिकमधील दिंडोरी येथील त्यांच्या गावी नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तसेच गावातील नागरिकांनीही ते कुठे असल्याचे माहित नसल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाचा निकाल लागत असतानाच नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्यानंतर झिरवळ हे त्यांच्या गावी असल्याचे झिरवळ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काल सुनावणीदरम्यान ही माहिती दिली होती. गुरुवारचा दिवस भरगच्च कामकाजाचा असेल, असे समलैंगिक विवाह प्रकरणावरील बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना सांगितले. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल न्या. चंद्रचूड यांनी लिहिलेला, तसेच सर्व न्यायाधीशांची सहमती लाभलेला ५-०, असा सर्वसंमतीचा असेल, असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, काल प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी सांगितलं होतं की, मी जो काही निकाल दिला होता तो कुठल्याही आकसाने दिला नव्हता. सार्वभौम सभागृह आहे,. ते घटनेवर चालतं. त्या पद्धतीने मी योग्य तो निर्णय दिला होता. त्यामुळे न्यायदेवता माझ्या निर्णयाचा निश्चितच विचार करेल. तसेच तत्कालीन अध्यक्ष मी होतो. अपात्रतेचा निर्णय हा माझ्याकडेच येईल, असा विश्वासही झिरवळ यांनी व्यक्त केला होता. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNarhari Jhariwalनरहरी झिरवाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदे