शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

औरंगाबादचे 'संभाजीनगर' कसे करणार? शिवसेनेची अखेरची खेळी कोणावर उलटणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 21:03 IST

Maharashtra Political Crisis: औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करावे अशी शिवसेनेची बऱ्याच काळापासूनची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांची खेळी करणार बंडखोरांची कोंडी?; औरंगाबादच्या नामांतराचा ठराव उद्याच होण्याची शक्यता

शिवसेनेने बऱ्याच काळापासूनची त्यांचीच औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याची मागणी आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडली आहे. उद्या पुन्हा बोलविलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णयही होण्याची शक्यता आहे. या साऱ्या घडामोडींवर शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंनी खेळलेल्या या हिंदुत्वाची खेळी यशस्वी होईल की त्यांच्यावरच उलटेल, याचा फायदा कोणाला होईल, याची चर्चा रंगली आहे. 

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करावे अशी शिवसेनेची बऱ्याच काळापासूनची मागणी आहे. उद्धव ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री होण्यापूर्वीच्या भाषणांत सत्तेत आल्यास संभाजीनगर नाव करणार अशा घोषणा केलेल्या आहेत. परंतु, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन झाली आणि अडीच वर्षे संपली तरी त्यावर बोलणे ते सातत्याने टाळत होते. आता ठाकरे सरकार संकटात आल्यावर अचानक मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी ही मागणी मांडली आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय, चर्चा करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. समजा मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलाच तर खरोखरच औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण होईल का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

शिवसेनेचे जे बंडखोर आमदार आहेत, त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यावर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार बाजुला ठेवले, संभाजीनगरचा मुद्दा बाजुला ठेवला हे त्यांचे आरोप आहेत. यावर प्रत्यूत्तर देण्यासाठी शिवसेनेने ही खेळी खेळली आहे. आम्ही नामांतरणाला मंजुरी दिलीय, आता पुढच्या सरकारवर त्याची जबाबदारी ढकलण्याचा हा प्रयत्न असणार आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे केंद्रात मोद आणि राज्यात फडणवीस सरकार असतानाही शिवसेनेने असा प्रस्ताव ठेवला नव्हता. यामुळे शिवसेनेने भाजपाच्या म्हणजेच शिंदे गटाच्या कोर्टात चेंडू टोलविला आहे. 

खरेतर राज्य सरकारने कोणत्याही शहराचा नामांतराचा प्रस्ताव दिला, तर तो केंद्राला पाठविला जातो. केंद्र सरकार त्यावर निर्णय देते. यामध्ये लष्कर, विविध सरकारी खाती आदींचा आक्षेप आदी गोष्टी विचारात घेतल्या जातात. यामध्ये राजकारणही विचारात घेतले जाते. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असेल तर ते सोपे जाते असा आजवरचा अनुभव आहे. बेळगावचे बेळगावी ते अगदी कालपर्यंत युपीतील शहरांची नावे बदलणे आदी यामुळेच शक्य झाले. 

औरंगाबादचे राजकारण काय? औरंगाबादवरून राजकीय फायदा झालाच तर तो शिवसेनेला होणार आहे. हिंदुत्व सोडल्याचा डागही पुसता येईल, आम्ही प्रयत्न केले परंतू केंद्राने अडवले असेही आरोप भाजपा आणि शिंदे गटावर करता येतील. परंतु नामांतर एवढे सोपे नाही. कारण औरंगाबादमधील मुस्लिम संघटना, पक्ष याला विरोध करण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेसचा विरोध मंत्रिमंडळ बैठकीत संपवायचा आणि जर नामांतरण यशस्वी नाही झालेच तर त्याचे खापर भाजपावर, केंद्रावर फोडायचे, असा दुहेरी फायदा उचलण्याचा शिवसेनेचा यामागे डाव असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना