शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis : "सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 18:10 IST

Maharashtra Political Crisis And Devendra Fadnavis : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "देवेंद्र आभाळा एवढा..." असं म्हणत कौतुक केलं आहे.

मुंबई - भाजपा-शिंदे गट एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. परंतु फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक मारत थेट पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेतला. या निर्णयाला भाजपाने पाठिंबा दिला. जवळपास १२३ संख्याबळ भाजपाकडे आहे. असे असतानाही मुख्यमंत्रिपद ते घेऊ शकले असते. परंतु मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. मोठे मन दाखवलं. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांचे आभार मानतो असंही शिंदे यांनी सांगितले. यानंतर आता भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचे भरभरून कौतुक केले आहे. 

भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "देवेंद्र आभाळा एवढा..." असं म्हणत कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विटही केलं आहे. "सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते" असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. तर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील देवेंद्र जी तुमच्या त्यागाला सलाम असं म्हणतं ट्विट केलं आहे. "पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना… सब समाज को लिये साथ मे आगे है बढते जाना.... देवेंद्र जी तुमच्या त्यागाला सलाम…" असं वाघ यांनी म्हटलं आहे. 

"50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात तेव्हा याचा अर्थ..."; एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. य़ानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 50 आमदार का वेगळी भूमिका घेतात? याबाबत स्पष्टच सांगितलं आहे. 

"राज्याच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहेत. 50 आमदार एकत्र आहोत. जे काही अडीच वर्षांपूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे. गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्र्यांना मतदार संघातील समस्या, अडचणी याबाबत वारंवार माहिती दिली. मी अनेकवेळा चर्चा केली. जी काही नैसर्गिक युती होती. एकत्र निवडणुका लढवल्या. आमदारांमध्ये जी नाराजी होती. राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही घडत होतं. काही सहकाऱ्यांवर झालेल्या कारवाई... महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते. हे सगळं होत असताना 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ म्हणजे आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. मोठ्या प्रमाणात 50 लोक एकत्र आले. त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. त्यामुळे हा निर्णय घेतला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Devendradada Deshmukhदेवेंद्रदादा देशमुखMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरChitra Waghचित्रा वाघ