शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

Devendra Fadnavis : "सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 18:10 IST

Maharashtra Political Crisis And Devendra Fadnavis : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "देवेंद्र आभाळा एवढा..." असं म्हणत कौतुक केलं आहे.

मुंबई - भाजपा-शिंदे गट एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. परंतु फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक मारत थेट पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेतला. या निर्णयाला भाजपाने पाठिंबा दिला. जवळपास १२३ संख्याबळ भाजपाकडे आहे. असे असतानाही मुख्यमंत्रिपद ते घेऊ शकले असते. परंतु मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. मोठे मन दाखवलं. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांचे आभार मानतो असंही शिंदे यांनी सांगितले. यानंतर आता भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचे भरभरून कौतुक केले आहे. 

भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "देवेंद्र आभाळा एवढा..." असं म्हणत कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विटही केलं आहे. "सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते" असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. तर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील देवेंद्र जी तुमच्या त्यागाला सलाम असं म्हणतं ट्विट केलं आहे. "पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना… सब समाज को लिये साथ मे आगे है बढते जाना.... देवेंद्र जी तुमच्या त्यागाला सलाम…" असं वाघ यांनी म्हटलं आहे. 

"50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात तेव्हा याचा अर्थ..."; एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. य़ानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 50 आमदार का वेगळी भूमिका घेतात? याबाबत स्पष्टच सांगितलं आहे. 

"राज्याच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहेत. 50 आमदार एकत्र आहोत. जे काही अडीच वर्षांपूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे. गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्र्यांना मतदार संघातील समस्या, अडचणी याबाबत वारंवार माहिती दिली. मी अनेकवेळा चर्चा केली. जी काही नैसर्गिक युती होती. एकत्र निवडणुका लढवल्या. आमदारांमध्ये जी नाराजी होती. राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही घडत होतं. काही सहकाऱ्यांवर झालेल्या कारवाई... महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते. हे सगळं होत असताना 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ म्हणजे आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. मोठ्या प्रमाणात 50 लोक एकत्र आले. त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. त्यामुळे हा निर्णय घेतला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Devendradada Deshmukhदेवेंद्रदादा देशमुखMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरChitra Waghचित्रा वाघ