शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Maharashtra Political Crisis: थोडा धीर धरा, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं सूचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 15:48 IST

Maharashtra Political Crisis: थोडं थांबा, उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

नाशिक - स्वपक्षातील आमदारांनी मोठ्या प्रमाणावर बंड केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, थोडं थांबा, उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

शिंदे सरकारचं भवितव्य आणि उद्धव ठाकरेंच्या पुनरागमनाबाबत संकेत देताना जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या आमदार्ंनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केलेलं आहे. त्याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पावलं उचलत या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्याच्यासमोर सुनावणी होऊन व्हीप झुगारणारे आमदार हे अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यपालांना उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावं लागेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सर्व घडामोडींचा उलगडा होईल. मात्र त्यासाठी काही काळ जावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलं. ते म्हणाले की, शिवसेनेला जो उमेदवार योग्य वाटतो, त्याला ते पाठिंबा देतात. त्यांनी भाजपासोबत असताना काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता, याचीही आठवण जयंत पाटील यांनी यावेळी करून दिली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस