शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: थोडा धीर धरा, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं सूचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 15:48 IST

Maharashtra Political Crisis: थोडं थांबा, उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

नाशिक - स्वपक्षातील आमदारांनी मोठ्या प्रमाणावर बंड केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, थोडं थांबा, उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

शिंदे सरकारचं भवितव्य आणि उद्धव ठाकरेंच्या पुनरागमनाबाबत संकेत देताना जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या आमदार्ंनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केलेलं आहे. त्याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पावलं उचलत या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्याच्यासमोर सुनावणी होऊन व्हीप झुगारणारे आमदार हे अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यपालांना उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावं लागेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सर्व घडामोडींचा उलगडा होईल. मात्र त्यासाठी काही काळ जावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलं. ते म्हणाले की, शिवसेनेला जो उमेदवार योग्य वाटतो, त्याला ते पाठिंबा देतात. त्यांनी भाजपासोबत असताना काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता, याचीही आठवण जयंत पाटील यांनी यावेळी करून दिली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस