शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे ४ आमदार बहुमत चाचणीवेळी गैरहजर? ठाकरे सरकार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:18 IST

राज्यातील शिवसेनेच्या ३९ नाराज आमदारांचा गट हा सरकारच्या विरोधात गेला आहे. तर काही अपक्षही शिंदे गटासोबत आहेत.

मुंबई - राज्यातील राजकारणात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भूकंप आल्याचं पाहायला मिळालं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका या आमदारांनी मांडली. विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला. गेल्या २१ जूनपासून शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला पोहचले. 

आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यात नऊ दिवसांनी या प्रकरणात भाजपाने थेट उडी घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी घेण्याची सूचना केली. ३० जून म्हणजे उद्याच विधिमंडळाचं विशेष अधिवेशन भरवलं जाणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईत हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे सरकार बहुमत चाचणीत टिकेल असा दावा मविआ नेते करत आहेत. परंतु संख्याबळात तुर्तास तरी हे चित्र दिसत नाही. 

राज्यातील शिवसेनेच्या ३९ नाराज आमदारांचा गट हा सरकारच्या विरोधात गेला आहे. तर काही अपक्षही शिंदे गटासोबत आहेत. त्यात मविआमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे २ सदस्य अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत आणि नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोन्हीही नेते क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीसाठी राष्ट्रवादीचे ४ आमदार हजर राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मविआ आणि उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

माझ्या बोलण्याचा इतका त्रास होत असेल तर मी थांबतो- संजय राऊत   शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सगळ्यात जास्त रोष संजय राऊत यांच्यावर व्यक्त केला आहे. त्यावर राऊत म्हणतात की, मी शिवसेनेचीच भूमिका मांडत असतो. माझ्या नेत्यांची भूमिका मांडतो आहे. महाराष्ट्राच्या स्थिरतेसाठी बोलतो आहे. याचा जर कुणाला त्रास होत असेल तर ठीक आहे मी बोलणं थांबवतो. आपण आधी मुंबईत या. पण मी बोलतोय आणि आदित्य ठाकरे बोलताहेत म्हणून येणार नाही हा बालिशपणा आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत. ते ठाकरे आहेत. त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. बंडखोरांनी आमच्या बोलण्याचं कारण देऊन अशी भूमिका घेणं योग्य नाही", असा टोला राऊतांनी लगावला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ