शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

"आता मोदींना राम दिसला असेल"; भाजपच्या धन्यवाद यात्रेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 20:44 IST

Sanjay Raut : महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मान्यासाठी भाजपकडून धन्यवाद यात्रा काढण्यात येणार आहे.

Sanjay Raut on BJP Dhanyawad Yatra : लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी २८ जागा लढवून केवळ ९ जागा मिळाल्या. या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री कायम असणार आहेत. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजप धन्यवाद यात्रा काढणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. त्यानंतर आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या धन्यवाद यात्रेवरुन टीका केली आहे.

महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मान्यासाठी भाजपकडून धन्यवाद यात्रा काढण्यात येणार आहे. "लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील ५ वर्षात होणारी विकासकामे व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद यात्रा काढणार आहे, ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार आहोत," असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या धन्यवाद यात्रेवरुन संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे. "भाजप आता आभार, धन्यवाद यात्रा काढणार आहे. महाराष्ट्राने पराभव केल्याबद्दल. नरेंद्र मोदींना बहुमतमुक्त केल्याबद्दल. ४०० पार करणार होते पण २४० वर आणून ठेवल्याबद्दल आभार यात्रा काढणार आहेत. यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. भाजपवाले नशेत आहेत. पण तुम्हाला महाराष्ट्राने नाकरालं आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली. मला वाटत होतं की मंदिरात प्रभू रामाची प्रतिष्ठापणा आहे की मोदींची. मी चार तास टीव्ही पाहत होतो पण मला रामाची मूर्ती दिसली नाही फक्त मोदीच दिसले. आता मोदींना राम दिसला असेल. देशाच्या जनतेने मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला कारण ते नकली आणि ढोंगी होतं," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खुळखुळा केला - संजय राऊत

"आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांबरोबर झुकणार नाही हे मोदी शाह यांना उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं. आज त्यांच्याकडे संपूर्ण देश अपेक्षेने पाहतो आहे. मोदी शाह यांचा पराभव अशक्य आहे, मोदी ४०० पार येणार हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे असं वातावरण होतं. जन्माला येतानाच ते ४०० खुळखुळे घेऊन आले असंच चाललं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी मोदींचा आणि भाजपाचा खुळखुळा करुन दाखवला," असेही संजय राऊत यांनी म्हटलं.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस