शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजितदादांचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 21:36 IST

राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद दोन्ही हवी असल्याची चर्चा आहे.

मुंबईः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या २९व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरेंबरोबर सहा मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चुरस असल्याचं समोर आलं आहे. विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यास काँग्रेस तयार असली तरी त्यांना त्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. पण राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद दोन्ही हवी असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमधल्या अध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसून काँग्रेसने मात्र दोन उपमुख्यमंत्री करावे, विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीने घ्यावे, असा तोडगा सुचवला आहे. 

त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा नाही. तिन्ही पक्षांच्या बैठकीत जबाबदारी देत असताना अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या(काँग्रेस)कडे द्यायची आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे द्यायची, असं ठरलं आहे. तर मुख्यमंत्र्यांची जबाबदारी शिवसेनेकडे द्यायची आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे द्यायची, असं निश्चित झालेलं आहे. तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी जी काही नाव ठरवलेली होती, त्यांनी काल शपथ घेतली. बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, असं म्हणत अजित पवारांनी सूचक इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत एकच उपमुख्यमंत्रिपद असेल व विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल, असा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. गुरुवारी दिवसभरात बऱ्याच घडामोडी झाल्या. काँग्रेसने अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित केले होते. परंतु त्या नावाला राष्ट्रवादीनं विरोध केल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे असे ठरले तिन्ही पक्षांचं ठरलं होतं. पण आता काँग्रेसला १३ मंत्रिपदे हवी आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळतं हे येत्या काळात समजणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना