शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजितदादांचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 21:36 IST

राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद दोन्ही हवी असल्याची चर्चा आहे.

मुंबईः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या २९व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरेंबरोबर सहा मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चुरस असल्याचं समोर आलं आहे. विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यास काँग्रेस तयार असली तरी त्यांना त्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. पण राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद दोन्ही हवी असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमधल्या अध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसून काँग्रेसने मात्र दोन उपमुख्यमंत्री करावे, विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीने घ्यावे, असा तोडगा सुचवला आहे. 

त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा नाही. तिन्ही पक्षांच्या बैठकीत जबाबदारी देत असताना अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या(काँग्रेस)कडे द्यायची आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे द्यायची, असं ठरलं आहे. तर मुख्यमंत्र्यांची जबाबदारी शिवसेनेकडे द्यायची आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे द्यायची, असं निश्चित झालेलं आहे. तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी जी काही नाव ठरवलेली होती, त्यांनी काल शपथ घेतली. बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, असं म्हणत अजित पवारांनी सूचक इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत एकच उपमुख्यमंत्रिपद असेल व विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल, असा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. गुरुवारी दिवसभरात बऱ्याच घडामोडी झाल्या. काँग्रेसने अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित केले होते. परंतु त्या नावाला राष्ट्रवादीनं विरोध केल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे असे ठरले तिन्ही पक्षांचं ठरलं होतं. पण आता काँग्रेसला १३ मंत्रिपदे हवी आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळतं हे येत्या काळात समजणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना