शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"हे सरकार जितके दिवस चालेल..."; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 17:48 IST

देवेंद्र फडणवीस हे मोठे आणि ⁠जिगरबाज नेते आहेत, त्यांनी पळून जावू नये, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत देशात भाजपला सर्वात जास्ता जागा मिळाल्या असल्या तरी महाराष्ट्रात याऊलट चित्र आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. भाजपला २८ जागा लढवून केवळ ९ जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे. तसेच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी केली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. 

भाजपच्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत घेत देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कमी पडलो असे म्हटलं आहे. तसेच पक्षनेतृ्त्वाने मला सरकारमधून मोकळे करावी असे म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या घोषणेनतंर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत दिल्याने सरकार धोक्यात आल्याची चर्चा सुरु झालीय. यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हे सरकार जितके दिवस असेल तेवढाच आमचा फायदा होईल, असं विधान केलं आहे.

"ही भाजपची अंतर्गत बाब आहे त्यामुळे त्याबाबत बोलण्याची गरज नाही. भाजपला जनतेने नाकारले आहे. महाराष्ट्रात भाजपला नऊ जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्याचे आणि केंद्राचे नेतृत्व अपयशी ठरलं आहे. आता ते सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षाची वाताहत झाल्यानंतर ते जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याच्या निर्णय घेत असतील तर त्यांचे पक्ष नेतृ्त्व निर्णय घेईल. हे सरकार जितके दिवस असेल तेवढाच आमचा फायदा होईल. राज्यात भाजपचे नेतृ्त्व देवेंद्र फडणवीस करतात हे सर्वांनाच माहिती आहे. मग विजयाची जबाबदारी घेता तशी पराभवाची देखील घ्यायला हवी," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

"देवेंद्र फडणवीस हे मोठे आणि ⁠जिगरबाज नेते आहेत. त्यांनी पळून जावू नये. राज्यात भाजपला त्यांनी ⁠२२ जागांवरुन ९ जागांवर आणले आहे. लोकसभेला जो निकाल आला तसाच निकाल विधानसभेला येईपर्यंत त्यांनी थांबावे. ⁠ते पळून जाणारे नेते नाहीत.⁠ दोन पक्षांच्या जिवावर ते सरकार बनवून ते काम पाहत आहेत. त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही," असा खोचक टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल