शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपासारखं धाडसं शिवसेनेनं दाखवलं असतं तर चित्र वेगळं असतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 11:18 AM

शिवसेनेचे हे दिग्गज उमेदवार गेले अनेक वर्ष आपले गड सांभाळून होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपासोबत एकत्र येत युती केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेला होता.

मुंबई - गुरुवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर देशातील जनतेने पुन्हा एकदा मोदी सरकारला संधी दिल्याचं पाहायला मिळालं. राज्यातही शिवसेना-भाजपा युतीला अभूतपूर्व यश मिळालं. मात्र शिवसेनेतील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. चंद्रकांत खैरे, अनंत गीते, शिवाजी आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ अशा दिग्गजांना मोदीलाटेतही पराभूत व्हावं लागलं. 

शिवसेनेचे हे दिग्गज उमेदवार गेले अनेक वर्ष आपले गड सांभाळून होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपासोबत एकत्र येत युती केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात चित्र पालटलं. शिवसेनेने निवडणुकीच्या निकालात आपल्या जागा राखल्या. मागील लोकसभा निकालात शिवसेनेचे 18 खासदार जिंकले होते यंदाच्या निकालातही शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाले. मात्र ज्या नेत्यांबद्दल शिवसेनेला विश्वास होतो त्याच प्रस्थापित नेत्यांना जनतेने नाकारलं. या पराभवाचं चिंतन शिवसेनेला नक्की करावं लागणार आहे. 

अमरावतीत आनंदराव अडसूळ, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव, रायगड अनंत गीते, औरंगाबाद चंद्रकांत खैरे गेली अनेक वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. यंदाच्या निवडणुकीत ज्याप्रकारे भाजपाने आपल्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याचं धाडस दाखवलं तसं शिवसेनेने केलं असतं तर बहुदा राज्यातील निकालात शिवसेनेच्या खासदारांचे आकडे वाढले असते असचं म्हणावं लागेल. भाजपाने राज्यात सोलापूरचे शरद बनसोडे, लातूरचे सुनील गायकवाड, अहमदनगरचे दिलीप गांधी, पुण्याचे अनिल शिरोळे, ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, दिंडोरी हरिशचंद्र चव्हाण, जळगावचे ए.टी नाना पाटील  या विद्यमान खासदारांचा पत्ता कापला आणि या जागांवर नवीन उमेदवारांना संधी दिली. याठिकाणी भाजपाने पुन्हा विजय मिळविला असून शिवसेनेला हे जमलं नाही. 

शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगडमध्ये अनंत गीते, अमरावतीत आनंदराव अडसूळ, औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात जनमानसात तसेच पक्षांतर्गत नाराजी होती. शिरुर लोकसभेचं तिकीट द्यावं यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली. मात्र तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. अखेर शिरुर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रस्थापित शिवाजी आढळराव पाटील यांना धक्का देत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावला. निकालांवरुन स्पष्ट होतं की, शिवसेनेच्या प्रस्थापितांना जनतेने नाकारलं. त्यामुळे निवडणुकीपूर्वी जर उमेदवार बदलण्यावर शिवसेनेकडून चिंतन झालं असतं तर शिवसेनेच्या खासदारांची संख्या वाढलेली पाहायला मिळाली असती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालShiv SenaशिवसेनाBJPभाजपा