शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपा नेत्यांकडून जातीय आणि विषारी प्रचार - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 1:03 PM

वंचित बहुजन आघाडीमुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याचेही राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून जातीय आणि विषारी प्रचार करण्यात आल्याची टीका करत संसदेत खासदार असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडत होते. यापुढेही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. 

शुक्रवारी राजू शेट्टी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला शेतकऱ्यांशी देणं-घेणं नसल्यामुळे विरोध होता. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारची साथ सोडल्याचा पश्चाताप होत नाही. संसदेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडत होते. यापुढेही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीमुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याचेही राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात 8 ते 9 ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला  फटका बसला. तसेच, यंदाच्या निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून भाजपा नेत्यांकडून जातीय आणि विषारी प्रचार करण्यात आल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी केली. 

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने ‘जायंट किलर’ ठरले आहेत. धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा 96 हजार 39च्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत धैर्यशील माने यांना 585776 मते पडली तर राजू शेट्टी यांना 489737 मते पडली. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019