शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:41 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रचारसभा आज कोल्हापुरात होत आहे. या प्रचारसभेपूर्वी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. या टीकेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आज कोल्हापुरात होत आहे. या प्रचारसभेपूर्वी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. शिवरायांच्या गादीविरोधात प्रचारासाठी मोदी कोल्हापुरात येत आहेत. शाहू महाराजांना बिनविरोध निवडून देण्याचा आमचा प्रयत्न होता. पण मोदी येथे शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्या टीकेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शाहू महाराजांना महाविकास आघाडीने राज्यसभेवर का पाठवले नाही, असा सवाल हसन मुश्रिफ यांनी विचारला आहे.

संजय राऊत यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना सहन मुश्रिफ म्हणाले की, वास्तविक पाहता आमच्या छत्रपतींचा फार मोठा अपमान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवलं असतं तर त्यांचा फार मोठा सन्मान झाला असता, शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्यांना दारोदारी हिंडवून, महाविकास आघाडीने त्यांचा फार मोठा अपमान केला आहे, असा टोला हसन मुश्रिफ यांनी लगावला.

मोदींच्या आजच्या सभेवरून कोल्हापूरमध्ये सोशल मीडियावर ‘भीती गादीची म्हणून सभा मोदींची’, असा मजकूर व्हायरल होत आहे. त्याबाबत विचारले असता हसन मुश्रिफ म्हणाले की, सन्मान गादीला आणि मत मोदीला हे आपण आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही गादीचा सन्मानच करतोय. मात्र मत मोदींना देणार आहोत, असेही मुश्रिफ यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांसाठी आज कोल्हापूरमध्ये होत असलेल्या सभेवर टीका करताना संजय राऊत म्हणाले होते की, छत्रपती शाहू आणि त्यांच्याआधीचे सगळे या गादीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे. त्यामुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कोल्हापूरमधून उमेदवार उभं करणंच चूक आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकरांच्या परंपरेचा सन्मान करावा, अशी आमची इच्छा होती. कोल्हापूरची जागा शिवसेनेची होती. तरी आम्ही शाहू महाराज निवडणुकीला उभे राहताहेत हे ऐकल्यावर ती जागा त्यांच्यासाठी सोडली. पण भाजपाकडून नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येताहेत. नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते हे महाराष्ट्राची जनता  कधीच विसरणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले होते. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीHasan Mushrifहसन मुश्रीफSanjay Rautसंजय राऊतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४