शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 10:22 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मिळत असलेलं आव्हान मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दरम्यान, या प्रचार सभांवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि यांना टोला लगावला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे हे आव्हान मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दरम्यान, या प्रचार सभांवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि यांना टोला लगावला आहे. नरेंद्र मोदी तुम्हाला वाटत असेल की भरपूर सभा घेतल्या म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा फसेल, पण असं नाही आहे, १३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायेत, तर ४ जूनला भारतातील जनता मोदी सरकारचं विसर्जन करेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

एका प्रचारसभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी तुम्हाला वाटत असेल की भरपूर सभा घेतल्या म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा फसेल, पण असं नाही आहे. महाराष्ट्र भोळा आहे, महाराष्ट्र भाबडा आहे. पण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. मी छोट्या व्यापाऱ्यांना देखील सांगतो की, तुम्ही आला असाल गुजरातमधून पण वर्षांनुवर्षे तुम्ही महाराष्ट्रात राहताय. मोदी तसे वागले म्हणून उद्धव ठाकरे तसा नाही वागणार. आपण ज्याल्या द्यायचं तेवढं दिलं. मात्र आता विसरून जा. हे माझं वैभव भरलेलं आहे. निवडणूक मे महिन्याच्या तेरा तारखेला आहे. त्या तारखेला भाजपाचे तीन तेरा वाजवायचे आहेत, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. 

ते पुढे म्हणाले की, येत्या ४ जून रोजी संपूर्ण भारत विजयोत्सव साजरा करणार आहे. मोदी सरकारचं विसर्जन करणार आहे. त्यांना मला सोपानदेव यांची कविता ऐकवायची आहे. तिला वात्रटिका म्हणा किंवा काही म्हणा. येड्याच्या पार्श्वभागावर उगवळा बाभूळ, म्हणतो कसा सावलीला बरं आहे. पण अरे वेड्या त्याची मुळं कुठं गेलीत ती कळतंय का तुला, तसं हे बाभळीचं झाड यांच्या पार्श्वभागावरती उगवलं आहे. सावलीला बरं आहे म्हणताहेत, पण मुळ किती खोलवर गेली आहेत, हेच यांना कळत नाही आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.  

यावेळी लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. त्यातील पहिल्या तीन टप्प्यांमध्ये २४ जागांवर मतदान झालं आहे. तर उर्वरित २४ जागांसाठी १३  आणि २० मे रोजी मतदान होणार आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४