शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 12:02 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं असून, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता आहे, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं असून, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता आहे, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की,  नरेंद्र मोदी यांचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे. भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावर उपचार करणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. दहा वर्षे जी व्यक्ती पंतप्रधानपदावर बसलेली आहे. नेतृत्व करत आहे. जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी देशाचं भवितव्य, देशाचा विकास, या विषयावर आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत. मला तिसऱ्यांदा का निवडून द्यायला पाहिजे, यासाठी माझ्याकडे ही ब्लू प्रिंट आहे, असं सांगितलं पाहिजे. मी दहा वर्षांत ही कामं केली आहेत, हे सांगितलं पाहिजे. मात्र मोदींनी एकाही प्रचारसभेत अशी भूमिका मांडल्याचं दिसलं नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली आहे. जेव्हा पंतप्रधानपदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्ताने काहीही बोलू लागले. तेव्हा त्यांची प्रकृती बरी नाही, असे दिसते. त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भाजपाने त्यांना तातडीने प्रचारातून बाजूला करून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे. पंतप्रधानांची प्रकृती बरी नसल्याचं दिसतंय. ते सतत ज्या प्रकारची वक्तव्य करताहेत ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही. काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार नाहीत, असं विधान त्यांनी केलं. हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे. तेलंगाणात जाऊन त्यांनी काँग्रेस पक्ष हा अदानी आणि अंबानींकडून यांच्या काळ्या पैशावर निवडणुकी लढवताहेत. राहुल गांधी यांना या उद्योगपतींकडून टेम्पो भरभरून पैसा मिळतोत, असं विधान मोदींनी केलंय. ज्याने अदानीला संपूर्ण देश विकत घेण्यासाठी मदत केली. सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली. उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. तेच मोदी जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवर टीका करू लागले आहेत, ते पाहता ते पराभूत झाले आहेत. मोदींनी केलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पीएमएलए कायद्याद्वारे या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी खिचडी घोटाळ्यावरून केलेल्या टीकेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ४ जूनपर्यंत तुम्हाला जे तांडव करायचं आहे ते करा. त्यानंतर आम्ही तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढू. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावर बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे. स्वत: केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसानं पलायन केलं. स्वत:चे घोटाळे उघड होत असल्याने अटक होईल या भीतीने ज्याची गाळण उडाली, पाय लटपटू लागले. डोळ्यातून अश्रू काढले, असा माणूस भ्रष्टाचारावर बोलतो, हे गमतीशीर आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ahmednagar-pcअहमदनगर