शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 12:02 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं असून, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता आहे, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं असून, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता आहे, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की,  नरेंद्र मोदी यांचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे. भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावर उपचार करणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. दहा वर्षे जी व्यक्ती पंतप्रधानपदावर बसलेली आहे. नेतृत्व करत आहे. जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी देशाचं भवितव्य, देशाचा विकास, या विषयावर आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत. मला तिसऱ्यांदा का निवडून द्यायला पाहिजे, यासाठी माझ्याकडे ही ब्लू प्रिंट आहे, असं सांगितलं पाहिजे. मी दहा वर्षांत ही कामं केली आहेत, हे सांगितलं पाहिजे. मात्र मोदींनी एकाही प्रचारसभेत अशी भूमिका मांडल्याचं दिसलं नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली आहे. जेव्हा पंतप्रधानपदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्ताने काहीही बोलू लागले. तेव्हा त्यांची प्रकृती बरी नाही, असे दिसते. त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भाजपाने त्यांना तातडीने प्रचारातून बाजूला करून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे. पंतप्रधानांची प्रकृती बरी नसल्याचं दिसतंय. ते सतत ज्या प्रकारची वक्तव्य करताहेत ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही. काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार नाहीत, असं विधान त्यांनी केलं. हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे. तेलंगाणात जाऊन त्यांनी काँग्रेस पक्ष हा अदानी आणि अंबानींकडून यांच्या काळ्या पैशावर निवडणुकी लढवताहेत. राहुल गांधी यांना या उद्योगपतींकडून टेम्पो भरभरून पैसा मिळतोत, असं विधान मोदींनी केलंय. ज्याने अदानीला संपूर्ण देश विकत घेण्यासाठी मदत केली. सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली. उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. तेच मोदी जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवर टीका करू लागले आहेत, ते पाहता ते पराभूत झाले आहेत. मोदींनी केलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पीएमएलए कायद्याद्वारे या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी खिचडी घोटाळ्यावरून केलेल्या टीकेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ४ जूनपर्यंत तुम्हाला जे तांडव करायचं आहे ते करा. त्यानंतर आम्ही तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढू. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावर बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे. स्वत: केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसानं पलायन केलं. स्वत:चे घोटाळे उघड होत असल्याने अटक होईल या भीतीने ज्याची गाळण उडाली, पाय लटपटू लागले. डोळ्यातून अश्रू काढले, असा माणूस भ्रष्टाचारावर बोलतो, हे गमतीशीर आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ahmednagar-pcअहमदनगर