शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; गृहमंत्री म्हणाले, पोलीस कारवाई करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 11:10 IST

Kirit Somaiya Attacked in Mumbai: "पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही. पोलिसांना त्यांचे काम माहिती आहे."

Kirit Somaiya Attacked in Mumbai: मुंबई शहरात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना वाद सुरू झाला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यांच्या तोंडालाही दुखापत झाली. या हल्ल्यावर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "कालची घटना दुर्दैवी, मात्र सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा. त्या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे,- पोलीस योग्य ती कारवाई करतील," असे पाटील म्हणाले. 

'पोलीस कारवाई करतील...'या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "गेले दोन दिवस मुंबईत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई म्हणून राणा दाम्पत्याला अटक केली. पण, रात्री किरीट सोमय्यांवर हल्ल्याची जी घटना घडली आहे, त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील. राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी केली अस काही दिसत नाही. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे", असं वळसे पाटील म्हणाले.

"समजूतदारपणा दाखवावा"ते पुढे म्हणाले की, "घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण आता त्यात सगळ्यांनीच समजुतीने सहकार्य करायला हवं. दगडफेक झाली आहे हे खरं आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार केलीये, त्याच्यावर पोलीस चौकशी करून कारवाई करतील. पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही, त्यांना त्यांचे काम काय आहे हे माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलं पाहिजे", असंही ते म्हणाले.

काल रात्री नेमकं काय झालं?अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिलेल्या हनुमान चालीसा पठणाच्या इशाऱ्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले, पण परत जाताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले. त्या हल्ल्यानंतर आता भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी सुचेल तशाप्रकारे आंदोलन करावे. आता ही लढाई भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार आहे. या लढाईसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा