शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; गृहमंत्री म्हणाले, पोलीस कारवाई करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 11:10 IST

Kirit Somaiya Attacked in Mumbai: "पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही. पोलिसांना त्यांचे काम माहिती आहे."

Kirit Somaiya Attacked in Mumbai: मुंबई शहरात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना वाद सुरू झाला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यांच्या तोंडालाही दुखापत झाली. या हल्ल्यावर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "कालची घटना दुर्दैवी, मात्र सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा. त्या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे,- पोलीस योग्य ती कारवाई करतील," असे पाटील म्हणाले. 

'पोलीस कारवाई करतील...'या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "गेले दोन दिवस मुंबईत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई म्हणून राणा दाम्पत्याला अटक केली. पण, रात्री किरीट सोमय्यांवर हल्ल्याची जी घटना घडली आहे, त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील. राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी केली अस काही दिसत नाही. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे", असं वळसे पाटील म्हणाले.

"समजूतदारपणा दाखवावा"ते पुढे म्हणाले की, "घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण आता त्यात सगळ्यांनीच समजुतीने सहकार्य करायला हवं. दगडफेक झाली आहे हे खरं आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार केलीये, त्याच्यावर पोलीस चौकशी करून कारवाई करतील. पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही, त्यांना त्यांचे काम काय आहे हे माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलं पाहिजे", असंही ते म्हणाले.

काल रात्री नेमकं काय झालं?अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिलेल्या हनुमान चालीसा पठणाच्या इशाऱ्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले, पण परत जाताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले. त्या हल्ल्यानंतर आता भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी सुचेल तशाप्रकारे आंदोलन करावे. आता ही लढाई भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार आहे. या लढाईसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा