शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; गृहमंत्री म्हणाले, पोलीस कारवाई करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 11:10 IST

Kirit Somaiya Attacked in Mumbai: "पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही. पोलिसांना त्यांचे काम माहिती आहे."

Kirit Somaiya Attacked in Mumbai: मुंबई शहरात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना वाद सुरू झाला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यांच्या तोंडालाही दुखापत झाली. या हल्ल्यावर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "कालची घटना दुर्दैवी, मात्र सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा. त्या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे,- पोलीस योग्य ती कारवाई करतील," असे पाटील म्हणाले. 

'पोलीस कारवाई करतील...'या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "गेले दोन दिवस मुंबईत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई म्हणून राणा दाम्पत्याला अटक केली. पण, रात्री किरीट सोमय्यांवर हल्ल्याची जी घटना घडली आहे, त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील. राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी केली अस काही दिसत नाही. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे", असं वळसे पाटील म्हणाले.

"समजूतदारपणा दाखवावा"ते पुढे म्हणाले की, "घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण आता त्यात सगळ्यांनीच समजुतीने सहकार्य करायला हवं. दगडफेक झाली आहे हे खरं आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार केलीये, त्याच्यावर पोलीस चौकशी करून कारवाई करतील. पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही, त्यांना त्यांचे काम काय आहे हे माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलं पाहिजे", असंही ते म्हणाले.

काल रात्री नेमकं काय झालं?अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिलेल्या हनुमान चालीसा पठणाच्या इशाऱ्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले, पण परत जाताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले. त्या हल्ल्यानंतर आता भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी सुचेल तशाप्रकारे आंदोलन करावे. आता ही लढाई भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार आहे. या लढाईसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा