शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Mumbai Rains: महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस; पाहा कुठे-कुठे रेड अन् ऑरेंज अलर्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 12:23 IST

मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवड्याच्या सुरूवातीपासून सुरू असलेली पावसाची बॅटिंग अजूनही अविरतपणे सुरूच आहे. पावसाच्या तडाख्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पूरपरिस्थिती ओढवली असून बरेच ठिकाणी अशी परिस्थिती ओढवू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे. गेल्या आठ ते १० दिवसांपासून राज्यात सर्वदूर सुरू असलेला या आठवड्यातही सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात आजही पाऊस सुरूच असून पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येत्या १५ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथील काही विभागांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. पावसाच्या तडाख्याने कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाल्याची स्थिती आहे. नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई, ठाणे, उपनगरं, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कुठे ऑरेंज तर कुठे रेड अलर्ट!

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्यापर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे. तर दक्षिण कोकणात आणि गोव्यामध्येही काहीशी तशीतच स्थिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून या विभागात १५ जुलैपर्यंत तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्याला देखील उद्यापर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या विभागात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईkonkanकोकण