शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Maharashtra Mini Lockdown: राज्यात दारूची दुकानं पण बंद होणार का? आरोग्य मंत्र्यांनी तळीरामांना झापलं, काय म्हणाले वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 20:12 IST

Maharashtra Mini Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य सरकारनं निर्बंधांची नवी नियमावाली (Maharashtra corona guidelines) जाहीर केली आहे.

Maharashtra Mini Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य सरकारनं निर्बंधांची नवी नियमावाली (Maharashtra corona guidelines) जाहीर केली आहे. यानुसार राज्यात आज मध्यरात्रीपासून नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. पण नव्या नियमावलीमध्ये मंदिरं, धार्मिक स्थळांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसंच मद्यविक्रीबाबतही कोणत्याही सूचना किंवा निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. 

राज्य सरकारच्या नव्या नियमावलीवर टीका करताना आमदार सदाभाऊ खोत यांनी आज राज्यात 'ग्लास' सुरू आणि 'क्लास' बंद, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं म्हणत सरकारकडून मद्यविक्रीवर कोणतेही निर्बंध लागू न करण्यात आल्याबद्दल टीका केली आहे. राज्यात दारूवरील टॅक्स कमी केला जातो आणि शाळा बंद केल्या जातात असा अजब कारभार सुरू असल्याचं खोत म्हणाले. राज्य सरकारवर नव्या नियमावरून जोरदार टीका होत असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचंही विधान समोर आलं आहे. 

राज्यात नागरिकांनी गर्दी करणं जर असंच सुरू ठेवलं तर मंदिरं, धार्मिक स्थळं आणि मद्यविक्रीची दुकानं देखील बंद केली जातील असा इशाराच दिला आहे. "राज्यात जोवर ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रीक टनांवर पोहोचत नाही आणि रुग्णालयातील उपलब्ध बेड्सपैकी ४० टक्के बेड्स भरले जात नाहीत तोवर नवे निर्बंध लागू करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही. पण लोकांनी जर रस्त्यावर निष्काळजीपणे वागून गर्दी करणं सुरूच ठेवलं तर मद्यविक्रीसह इतर दुकानांवरही कडक निर्बंध लावावे लागतील", असं स्पष्ट केलं आहे. 

कोरोना वाढला तर मंदिरं देखील होणार बंद"गर्दी वाढली आणि नियमांचं पालन होताना दिसलं नाही तर मद्यविक्रीचीही दुकानं बंद केली जातील. यासोबत धार्मिक स्थळं देखील बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल", असं राजेश टोपे म्हणाले. राज्यात सध्या ऑक्सिजनची मागणी साडेचारशे मेट्रिक टनच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे सध्यातरी निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नसल्याचंही टोपे म्हणाले. परिस्थितीत बदल होईल तसे निर्णय घेण्यात येतील. कारण कोरोना रुग्णसंख्या वाढली तर महामारीला नियंत्रित करणं खूप कठीण होऊन बसेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्या