शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

स्वाईन फ्लुचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात; देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 06:00 IST

देशात २०१० ते २०१९ या दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे ११ हजार जणांचा स्वाईन फ्लुमुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देराष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राच्या जवळपासही नाही अन्य राज्यदहा वर्षांमध्ये सुमारे २९ हजार जणांना स्वाईन फ्लुची लागणमहाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक मृत्यू गुजरातमध्ये सुमारे १९०० एवढे

राजानंद मोरे - पुणे : आरोग्यविषयक सुविधांबाबत देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात स्वाईन फ्लुचे (एच  १एन १) सर्वाधिक बळी गेल्याचे आकडेवारी समोर आली आहे. देशात २०१० ते २०१९ या दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे ११ हजार जणांचा स्वाईन फ्लुमुळे मृत्यू झाला. त्यामध्ये सुमारे साडे तीन हजार जण महाराष्ट्रातील होते. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रा (एनसीडीसी)च्या या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राच्या जवळपासही अन्य राज्य नाही. नवी दिल्ली येथील ‘एनसीडीसी’च्या इंटिग्रेटेड डिसिज सर्व्हिलन्स प्रोग्रॅमअंतर्गत सेंट्रल सर्व्हिलन्स युनिटकडून सर्व राज्य व केंंद्रशासित प्रदेशांची स्वाईन फ्लुची आकडेवारी संकलित केली जाते. ‘एनसीडीसी’च्या संकेतस्थळावर २०१० पासूनची आकडेवारी देण्यात आली आहे. देशात आॅगस्ट २००९ मध्ये स्वाईन फ्लुचा पहिला रुग्ण पुण्यात दगावला होता. त्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग आली. सर्व राज्यांतील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. रुग्णालयांबाहेर सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्यामध्ये पहिला मृत्यू झाल्याने विशेष दक्षता घेण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत स्वाईन फ्लुच्या विषाणुने महाराष्ट्राची पाठ सोडलेली नाही.  ‘एनसीडीसी’च्या आकडेवारीनुसार, २०१० मध्ये देशात स्वाईन फ्लुमुळे १७६३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये ६६९ रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील होते. २०१५ हे वर्ष महाराष्ट्रासाठी सर्वाधिक बाधा देणारे वर्ष ठरले. यावर्षी ८ हजार ५८३ जणांना स्वाईन फ्लुची लागण झाली होती. त्यापैकी ९०५ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर २०१७ मध्ये ७७८, २०१८ मध्ये ४६१ तर मागील वर्षी २४६ जणांचा मृत्यू झाला. मागील दहा वर्षांमध्ये सुमारे २९ हजार जणांना स्वाईन फ्लुची लागण झाली. हा आकडा इतर कोणत्याही राज्याच्या जवळपासही नाही.--------------

दहा वर्षात ३४१७ जणांचा मृत्यूमागील दहा वर्षात महाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक मृत्यू गुजरातमध्ये सुमारे १९०० एवढे झाले आहेत. तर त्याखालोखाल राजस्थानमध्ये १६०० जणांचा बळी गेला. त्यानंतर कर्नाटक (५२०), उत्तर प्रदेश (२८०), आंध्रप्रदेश (१८४), तामिळनाडू (१६६), दिल्ली (१६५) या राज्यांचा क्रमांक लागतो...............

 * महाराष्ट्रातील २०१० पासूनची स्वाईन फ्लुची स्थिती -वर्ष                        बाधित                               मृत्यू२०१०                     ६,८१४                               ६६९२०११                       २६                                   ५२०१२                   १,५५१                                १३५    २०१३                     ६४३                                 १४९२०१४                    ११५                                  ४३    २०१५                   ८,५८३                               ९०५२०१६                     ८२                                  २६    २०१७                   ६,१४४                              ७७८    २०१८                   २,५९३                              ४६१२०१९                  २,२८७                              २४६२०२०                      २२                    ०० (दि. २ फेब्रु.पर्यंत)------------------------------------एकुण              २८,८६०                             ३,४१७------------------------------------देशाची स्वाईन फ्लुची स्थिती (२०१०-१९)वर्ष          स्वाईन फ्लुची लागण                  मृत्यू२०१०        २०,६०४                                    १,७६३२०११        ६०३                                            ७५२०१२        ५,०४४                                         ४०५२०१३        ५,२५३                                         ६९९२०१४        ९३७                                            २१८२०१५       ४२,५९२                                       २,९९१२०१६        १७,८६                                        २६३२०१७    ३८,८११                                         २,२७०२०१८        १५,२६६                                     १,१२८२०१९        २८,७९८                                     १,२१८----------(स्त्रोत : एनसीडीसी, नवी दिल्ली)

टॅग्स :PuneपुणेSwine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्यDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल