शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा बनलंय; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 12:06 IST

या गुंड टोळ्याचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री करणार की उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 

नवी दिल्ली - Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) संसदेत मोदींची भाषणे प्रचाराची असते, देशातील कुठल्याही गंभीर प्रश्नावर मोदींनी स्पर्श केला नाही. गेल्या २ वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसेचा उद्रेक आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर आले. दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. चीनची घुसखोरी वाढलीय या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले. महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हा गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा झालाय. बेकायदेशीर जे मुख्यमंत्री नेमलेत ते गुंडांना पोसतायेत. पोलीस स्टेशनमध्ये आमदार गोळीबार करतायेत. मोदी काही बोलले का? असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. 

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राज्यातील मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात ज्याप्रकारे गुंड टोळ्या येऊन भेटतायेत. शासकीय निवासस्थानी खून, दरोडे, बलात्कार या गुन्ह्यात जामीनावर सुटलेले आणि बाहेर काढलेले या गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करत आहेत. या गुंड टोळ्याचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री करणार की उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 

देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे

मोदींनी ७८ मिनिटे काँग्रेसवर, नेहरुंवर आणि इंदिरा गांधींवर टीका करत राहिले. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा. नेहरुंनी केलेल्या कामाची भीती भाजपाच्या मनातून जात नाही. शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात १७०० शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करताय? भाजपाही एकाच प्रॉडक्टवर चाललेले आहे. मोदींशिवाय भाजपाला पर्याय आहे का? हा देश हुकुमशाहीकडे चालला आहे. चंदिगडच्या महापौर निवडणुकीत भाजपाने केलेल्या भ्रष्टाचार हे हुकुमशाहीचे उदाहरण आहे. मोदींनी डोळ्यावर पट्टी बांधलीय त्यांना दिसत नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. 

तसेच चंदिगडबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने झापलं त्याला आम्ही फार किंमत देत नाही. आम्ही कोर्टाचा आदर करतो. महाराष्ट्राच्या प्रकरणातही घटनाबाह्य सरकारला सर्वोच्च न्यायलयाने झापलं होते. त्यांच्या झापाझापीचं स्वागत करतो पण निर्णयाचे काय? सर्वोच्च न्यायलयाने झापूनसुद्धा ज्याप्रकारे राहुल नार्वेकर या व्यक्तीने निकाल दिला आणि घटनाबाह्य सरकारला मान्यता दिली. सर्वोच्च न्यायलयाला आम्ही जुमानत नाही अशी शहनशाही चालली आहे. सर्वोच्च न्यायलयाने राहुल नार्वेकरांना किंवा या सरकारला बरखास्त केले का?. सरळ पक्षांतर झाले आहे. संविधान पायदळी तुडवलं आहे आणि सर्वोच्च न्यायलय झापतंय. त्यामुळे आता झापण्यापलीकडची पाऊले टाका असं विधानही संजय राऊतांनी केले आहे. 

दरम्यान, गेल्या ७० वर्षात देश उभा राहिलाय त्याची फळे मोदी आणि भाजपा खातायेत. मोदींच्या काळात तुम्ही देशाला किती कर्तबगार बनवलं हे सांगावे. बेरोजगारांना पकोडे तळण्याचा सल्ला देताय. ८० कोटी गरिबांना ५ किलो अन्न फुकट देताय, लोकांना रोजगार हवाय आणि तुम्ही रामलल्लाचे दर्शन फुकटात नेतायेत. या देशातील दहशतवाद आणि गुंडगिरीवर बोला. या देशातील लोकशाही संस्था, संविधानिक संस्था तुम्ही संपवतायेत. ८० कोटी जनतेला ५ किलो फुकट धान्य देऊन मोदींनी देशाला गुलाम केलेले आहे. ही लाच आहे. लोकांना अधिक आळशी बनवण्याचा हा प्रकार आहे. हे नेहरूंपेक्षाही भयंकर आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा