शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

महाराष्ट्र गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा बनलंय; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 12:06 IST

या गुंड टोळ्याचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री करणार की उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 

नवी दिल्ली - Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) संसदेत मोदींची भाषणे प्रचाराची असते, देशातील कुठल्याही गंभीर प्रश्नावर मोदींनी स्पर्श केला नाही. गेल्या २ वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसेचा उद्रेक आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर आले. दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. चीनची घुसखोरी वाढलीय या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले. महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हा गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा झालाय. बेकायदेशीर जे मुख्यमंत्री नेमलेत ते गुंडांना पोसतायेत. पोलीस स्टेशनमध्ये आमदार गोळीबार करतायेत. मोदी काही बोलले का? असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. 

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राज्यातील मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात ज्याप्रकारे गुंड टोळ्या येऊन भेटतायेत. शासकीय निवासस्थानी खून, दरोडे, बलात्कार या गुन्ह्यात जामीनावर सुटलेले आणि बाहेर काढलेले या गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करत आहेत. या गुंड टोळ्याचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री करणार की उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 

देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे

मोदींनी ७८ मिनिटे काँग्रेसवर, नेहरुंवर आणि इंदिरा गांधींवर टीका करत राहिले. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा. नेहरुंनी केलेल्या कामाची भीती भाजपाच्या मनातून जात नाही. शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात १७०० शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करताय? भाजपाही एकाच प्रॉडक्टवर चाललेले आहे. मोदींशिवाय भाजपाला पर्याय आहे का? हा देश हुकुमशाहीकडे चालला आहे. चंदिगडच्या महापौर निवडणुकीत भाजपाने केलेल्या भ्रष्टाचार हे हुकुमशाहीचे उदाहरण आहे. मोदींनी डोळ्यावर पट्टी बांधलीय त्यांना दिसत नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. 

तसेच चंदिगडबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने झापलं त्याला आम्ही फार किंमत देत नाही. आम्ही कोर्टाचा आदर करतो. महाराष्ट्राच्या प्रकरणातही घटनाबाह्य सरकारला सर्वोच्च न्यायलयाने झापलं होते. त्यांच्या झापाझापीचं स्वागत करतो पण निर्णयाचे काय? सर्वोच्च न्यायलयाने झापूनसुद्धा ज्याप्रकारे राहुल नार्वेकर या व्यक्तीने निकाल दिला आणि घटनाबाह्य सरकारला मान्यता दिली. सर्वोच्च न्यायलयाला आम्ही जुमानत नाही अशी शहनशाही चालली आहे. सर्वोच्च न्यायलयाने राहुल नार्वेकरांना किंवा या सरकारला बरखास्त केले का?. सरळ पक्षांतर झाले आहे. संविधान पायदळी तुडवलं आहे आणि सर्वोच्च न्यायलय झापतंय. त्यामुळे आता झापण्यापलीकडची पाऊले टाका असं विधानही संजय राऊतांनी केले आहे. 

दरम्यान, गेल्या ७० वर्षात देश उभा राहिलाय त्याची फळे मोदी आणि भाजपा खातायेत. मोदींच्या काळात तुम्ही देशाला किती कर्तबगार बनवलं हे सांगावे. बेरोजगारांना पकोडे तळण्याचा सल्ला देताय. ८० कोटी गरिबांना ५ किलो अन्न फुकट देताय, लोकांना रोजगार हवाय आणि तुम्ही रामलल्लाचे दर्शन फुकटात नेतायेत. या देशातील दहशतवाद आणि गुंडगिरीवर बोला. या देशातील लोकशाही संस्था, संविधानिक संस्था तुम्ही संपवतायेत. ८० कोटी जनतेला ५ किलो फुकट धान्य देऊन मोदींनी देशाला गुलाम केलेले आहे. ही लाच आहे. लोकांना अधिक आळशी बनवण्याचा हा प्रकार आहे. हे नेहरूंपेक्षाही भयंकर आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा