शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Maharashtra Government: ईडीची फाईल आताच कशी काय उघडते?; शिवसेनेकडून नव्या मित्राचा 'आदर्श' बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 10:39 IST

गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या राजकीय नाट्याला आज पूर्णविराम मिळणार आहे.

मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या राजकीय नाट्याला आज पूर्णविराम मिळणार आहे. महाविकास आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीमुळे शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आहे. भाजपाला आपल्या धारदार विधानांनी जेरीस आणणारे संजय राऊतांनीही महाराष्ट्रासाठी आज ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे. माननीय उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. महाराष्ट्रासाठी आज आनंदाचा तितकाच ऐतिहासिक दिवस आहे. साधारण 20 वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात शपथ घेतोय, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. 

महिन्याभराचा संघर्ष आपण पाहिलेलाच आहे, त्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कायदेशीर आणि राजकीय असे अनेक डावपेच टाकण्यात आले. त्या सगळ्यांवर मात करून आजचा दिवस उगवलेला आहे. मला वाटतं हे सरकार पूर्ण पाच वर्षं टिकेल. केंद्राच्या ताब्यात ज्या संस्था आहेत, त्यांचा गैरवापर पुन्हा केला जाईल, असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. कालपर्यंत जे सत्ताधारी होते, त्यांच्यासुद्धा ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशा व्हाव्यात, अशा प्रकारचे काही पुरावे समोर आलेले आहेत. परंतु उद्धव ठाकरेंनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की, आम्ही सुडाचं राजकारण करणार नाही.तुम्ही चौकशांचा कितीही ससेमिरा लावला. तुम्ही कितीही अडथळे आणले तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील हे जे सरकार आहे. त्याला अजिबात तडा जाणार नाही. आम्ही संकटांवर मात करू आणि सरकार टिकवू. सरकारमध्ये सहभागी होतानाच ईडीची फाइल कशी काय ओपन केली जाते. हे सर्व हातखंडे वापरण्यात आलेले आहेत, आदर्श प्रकरणावरून राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार येऊ नये, यासाठी राष्ट्रपतींपासून राजभवनापर्यंत आणि सीबीआयपासून ईडीपर्यंत सर्वांचा दुरुपयोग करण्यात आला, पण या सर्वांनाच आम्ही मात दिलेली आहे. पंतप्रधानांनीही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस