शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

Maharashtra Government: सत्ताबाजारात कोणाची बाजी? सट्टेबाजांचा कौल कोणाला?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:30 IST

शिवसेना-काँग्रेससाठी ७० पैसे; भाजप सरकारसाठी रुपयाला साडेपाच रुपये भाव

- जमीर काझी मुंबई : गेल्या चार आठवड्यांपासून महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता कायम असल्याने, राज्यात कोण सरकार स्थापन करणार आणि केव्हा अस्तित्वात येणार? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सट्टेबाजार मात्र शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची एकत्रित महाशिवआघाडी अस्तित्वात येईल, याबाबत ठाम आहेत. सट्टेबाजारात मंगळवारी महाशिवआघाडीसाठी एक रुपयाला ७० पैसे तर भाजप सरकारसाठी रुपयाला साडेपाच रुपये दर लावण्यात आला.गेल्या महिन्यात निकाल जाहीर झाल्यापासून सट्टेबाजारात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येईल, हा बुकींचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत गेला आहे. आता नवीन सरकार नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी ‘फिफ्टी-फिफ्टी’च्या फार्म्युल्यावर अडून बसल्याने भाजपाला सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापन करता आली नाही, तर सेना व काँग्रेस आघाडीकडून अद्याप बहुमत असल्याचे दाखविलेले नाही. त्यामुळे आठवड्याभरापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. सेना व कॉँग्रेस आघाडीही एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असली, तरी पक्षश्रेष्ठींकडून अद्याप त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही.आघाडीच्या नेत्यांनी केवळ चर्चेचे गुन्हाळ चालू ठेवले आहे. तर १०५ जागा जिंकलेल्या भाजपने आपल्याशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही, असा दावा केला आहे. महाराष्ट्रातील या घडामोडीवर सध्याचा सट्टेबाजारही रंगला आहे. निकालानंतरचा पहिला आठवडा वगळता बुक्कींनी भाजप सरकारऐवजी महाशिवआघाडीला पसंती दिली आहे. येथील राजकीय सत्तानाट्याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे त्यावर मुंबईसह अहमदाबाद, सूरत, बंगळुरू आणि दिल्लीतही सट्टा लावला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.येणाऱ्या काळात सत्तेचे गुुऱ्हाळ ज्याप्रमाणे चालू राहील त्याप्रमाणे दर कमी- जास्त होणार आहेत. पण सध्या मात्र महाशिवआघाडीलाच पसंती असल्याचे दिसून येते आहे.शिवसेना आक्रमक झाल्यानंतर बदलले गणितविधानसभेचे निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर झाल्यानंतर पहिले २, ३ दिवस महायुतीचे सरकार अस्तित्वात येईल, या शक्यतेने त्यासाठी एक रुपयाला ४० पैसे इतका दर होता, तर कॉँग्रेस आघाडीसाठी एक रुपयाला ९ रुपये इतका भाव बुकींकडून दिला जात होता. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर आक्रमक झाल्यानंतर त्यांचे भाव कमी होत गेले. मात्र, भाजप सरकारसाठी जादा भाव दिला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस