शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Maharashtra Government: सत्ताबाजारात कोणाची बाजी? सट्टेबाजांचा कौल कोणाला?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:30 IST

शिवसेना-काँग्रेससाठी ७० पैसे; भाजप सरकारसाठी रुपयाला साडेपाच रुपये भाव

- जमीर काझी मुंबई : गेल्या चार आठवड्यांपासून महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता कायम असल्याने, राज्यात कोण सरकार स्थापन करणार आणि केव्हा अस्तित्वात येणार? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सट्टेबाजार मात्र शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची एकत्रित महाशिवआघाडी अस्तित्वात येईल, याबाबत ठाम आहेत. सट्टेबाजारात मंगळवारी महाशिवआघाडीसाठी एक रुपयाला ७० पैसे तर भाजप सरकारसाठी रुपयाला साडेपाच रुपये दर लावण्यात आला.गेल्या महिन्यात निकाल जाहीर झाल्यापासून सट्टेबाजारात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येईल, हा बुकींचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत गेला आहे. आता नवीन सरकार नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी ‘फिफ्टी-फिफ्टी’च्या फार्म्युल्यावर अडून बसल्याने भाजपाला सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापन करता आली नाही, तर सेना व काँग्रेस आघाडीकडून अद्याप बहुमत असल्याचे दाखविलेले नाही. त्यामुळे आठवड्याभरापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. सेना व कॉँग्रेस आघाडीही एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असली, तरी पक्षश्रेष्ठींकडून अद्याप त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही.आघाडीच्या नेत्यांनी केवळ चर्चेचे गुन्हाळ चालू ठेवले आहे. तर १०५ जागा जिंकलेल्या भाजपने आपल्याशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही, असा दावा केला आहे. महाराष्ट्रातील या घडामोडीवर सध्याचा सट्टेबाजारही रंगला आहे. निकालानंतरचा पहिला आठवडा वगळता बुक्कींनी भाजप सरकारऐवजी महाशिवआघाडीला पसंती दिली आहे. येथील राजकीय सत्तानाट्याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे त्यावर मुंबईसह अहमदाबाद, सूरत, बंगळुरू आणि दिल्लीतही सट्टा लावला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.येणाऱ्या काळात सत्तेचे गुुऱ्हाळ ज्याप्रमाणे चालू राहील त्याप्रमाणे दर कमी- जास्त होणार आहेत. पण सध्या मात्र महाशिवआघाडीलाच पसंती असल्याचे दिसून येते आहे.शिवसेना आक्रमक झाल्यानंतर बदलले गणितविधानसभेचे निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर झाल्यानंतर पहिले २, ३ दिवस महायुतीचे सरकार अस्तित्वात येईल, या शक्यतेने त्यासाठी एक रुपयाला ४० पैसे इतका दर होता, तर कॉँग्रेस आघाडीसाठी एक रुपयाला ९ रुपये इतका भाव बुकींकडून दिला जात होता. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर आक्रमक झाल्यानंतर त्यांचे भाव कमी होत गेले. मात्र, भाजप सरकारसाठी जादा भाव दिला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस