शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

Maharashtra Government: शिवसेनेच्या याचिकेला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

By अतुल कुलकर्णी | Published: November 13, 2019 5:29 AM

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नाही म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नाही म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या या याचिकेला बळ मिळावे म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे दोन दिवसाची मुदतवाढ मागितली, अशी माहिती समोर आली आहे.राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मात्र तशी तयारी दर्शविलेल्या पक्षांना त्यांनी वेळ वाढवून दिला नाही, असा युक्तीवाद न्यायालयात करता यावा यासाठी राष्ट्रवादीने मंगळवारी रात्री साडेआठची मुदत संपण्याच्या आतच राज्यपालांना पत्र देऊन दोन दिवस वाढवून मागितले. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीची मागणीही राज्यपालांनी फेटाळली व राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली.भाजपला महाराष्ट्रात भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाचे सरकार नको आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई केली, असा शिवसेनेचा दावा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील राज्यपालांनी शेवटचा पर्याय म्हणून काँग्रेसला ही विचारणा करायला हवी होती. काँग्रेसलाही वेळ द्यायला पाहिजे होता, पण तो दिला नाही अशी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सगळी राजकीय सूत्रे वाय बी चव्हाण सेंटर येथे बसून हलवत आहेत. अहमद पटेल यांच्याशीही ते सतत संपर्कात आहेत. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात जावे हा सल्ला त्यांनीच दिला. शिवसेना नेते अनिल परब हे स्वत: कपिल सिब्बल यांच्याशी बोलले. सिब्बल यांच्याशी पवार यांनीही बोलणे केल्याची सूत्रांनी माहिती दिली.राष्टÑवादीने राज्यपालांकडे मुदतवाढ मागितल्याची कोणतीही माहिती काँग्रेसला नव्हती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांकडूनही वेगवेगळी विधाने समोर आली. परिणामी दोन्ही पक्षातल्या समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस