शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Government: होय, मीच राष्ट्रवादी; अजित पवारांच्या वकिलाच्या युक्तिवादानं कोर्टात हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 13:08 IST

वकिलाच्या युक्तिवादानं न्यायालयात एकच हशा

नवी दिल्ली: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यायचा का व द्यायचा असेल, तर या शक्तिप्रदर्शनासाठी किती दिवसांचा अवधी द्यायचा यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी होणार आहे.राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राचा विषय सर्वोच्च न्यायालयात चर्चेत राहिला. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून अजित पवारांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांचं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं. राष्ट्रवादीच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत असल्याचा उल्लेख या पत्रात होता. ते पत्र आज न्यायालयात सादर करण्यात आलं.भाजपाच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या पत्राला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला. त्या पत्रावर ५४ आमदारांच्या सह्या असतीलही, पण भाजपाला पाठिंब्याचा उल्लेखच नाही, असा युक्तिवाद राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आला. एका कारणासाठी घेतलेलं पत्र अजित पवारांनी दुसऱ्या कारणासाठी वापरलं, अशी बाजू काँग्रेस, राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवींनी मांडली.अजित पवार यांच्या वतीनं मणींदर सिंग यांनी बाजू मांडली. अजित पवारांनी ५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्र राज्यपालांना दिलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीनं हे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं, असा युक्तिवाद त्यांनी केला. मीच राष्ट्रवादी आहे. होय, मीच राष्ट्रवादी आहे, असंदेखील मणींदर सिंग अजित पवारांच्या वतीनं म्हणाले. त्यानंतर न्यायालयात एकच हशा पिकला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस