शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

Maharashtra Government: राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र पाठवलं, काँग्रेसला नाही समजलं; महाआघाडीतील गोंधळ उघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 16:39 IST

पुन्हा दिसला काँग्रेस, राष्ट्रवादीतील समन्वयाचा अभाव

मुंबई: भाजपा, शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी काल राष्ट्रवादीला सरकार स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली होती. मात्र ती मुदत संपण्याआधीच राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र लिहिलं. राज्यपालांनी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळली. मात्र या सर्व घडामोडींपासून काँग्रेस अनभिज्ञ होती. त्यामुळे महाआघाडीतल्या दोन मोठ्या पक्षांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला.शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मतभेद समोर आले होते. यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही काँग्रेसमध्ये फारसा समन्वय नसल्याचं चित्र दिसलं. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेली मुदत आज रात्री ८.३० वाजता संपणार आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं दोन दिवस वाढवून द्यावेत, अशा विनंतीचं पत्र राष्ट्रवादीनं सकाळीच राज्यपालांना दिलं. मात्र याबद्दल काँग्रेसला कोणतीही कल्पना नव्हती. शिवसेनेनं पुरेसं संख्याबळ नसल्यानं काल रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना राजभवनावर बोलावलं. राज्यपालांनी राष्ट्रवादीला बहुमताचा दावा करण्यासाठी २४ तासांचा अवधी दिला. राज्यपालांनी रात्री साडे आठपर्यंतची मुदत राष्ट्रवादीला दिली होती. ती मुदत संपेपर्यंत राष्ट्रवादीने जर पत्र दिलं नसतं तर, राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली नसती. त्यामुळे घेऊन केंद्र सरकारनं पुढील कार्यवाही करण्याचा प्रश्नच आला नसता.आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाबाहेर जायचं होतं. त्याआधी निर्णय घेण्यासाठी दिल्लीत घाई होती. जर आज रात्री साडे आठपर्यंत राष्ट्रवादीनं काहीच कळवलं नसतं, तर राज्यपालांना केंद्रालाही माहिती देता आली नसती. परिणामी आजची केंद्रातली दुपारची तातडीची बैठक झाली नसती. पण राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या स्वाक्षरीचं पत्र राजभवनावर दुपारी देण्यात आलं. ते पत्र हाती येताच राज्यपालांनी त्यावर तातडीनं कार्यवाही केली. हे पत्र दिल्याची कसलीही माहिती काँग्रेसला नव्हती. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रवादीला दिलेली मुदत संपण्याआधीच राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं घटनाविरोधी असल्याचं ट्विट केलं. मात्र आता हे पत्र राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याची माहिती समोर आल्यामुळे काँग्रेस नेतेही बुचकळ्यात पडले आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार