शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र पाठवलं, काँग्रेसला नाही समजलं; महाआघाडीतील गोंधळ उघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 16:39 IST

पुन्हा दिसला काँग्रेस, राष्ट्रवादीतील समन्वयाचा अभाव

मुंबई: भाजपा, शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी काल राष्ट्रवादीला सरकार स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली होती. मात्र ती मुदत संपण्याआधीच राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र लिहिलं. राज्यपालांनी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळली. मात्र या सर्व घडामोडींपासून काँग्रेस अनभिज्ञ होती. त्यामुळे महाआघाडीतल्या दोन मोठ्या पक्षांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला.शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मतभेद समोर आले होते. यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही काँग्रेसमध्ये फारसा समन्वय नसल्याचं चित्र दिसलं. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेली मुदत आज रात्री ८.३० वाजता संपणार आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं दोन दिवस वाढवून द्यावेत, अशा विनंतीचं पत्र राष्ट्रवादीनं सकाळीच राज्यपालांना दिलं. मात्र याबद्दल काँग्रेसला कोणतीही कल्पना नव्हती. शिवसेनेनं पुरेसं संख्याबळ नसल्यानं काल रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना राजभवनावर बोलावलं. राज्यपालांनी राष्ट्रवादीला बहुमताचा दावा करण्यासाठी २४ तासांचा अवधी दिला. राज्यपालांनी रात्री साडे आठपर्यंतची मुदत राष्ट्रवादीला दिली होती. ती मुदत संपेपर्यंत राष्ट्रवादीने जर पत्र दिलं नसतं तर, राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली नसती. त्यामुळे घेऊन केंद्र सरकारनं पुढील कार्यवाही करण्याचा प्रश्नच आला नसता.आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाबाहेर जायचं होतं. त्याआधी निर्णय घेण्यासाठी दिल्लीत घाई होती. जर आज रात्री साडे आठपर्यंत राष्ट्रवादीनं काहीच कळवलं नसतं, तर राज्यपालांना केंद्रालाही माहिती देता आली नसती. परिणामी आजची केंद्रातली दुपारची तातडीची बैठक झाली नसती. पण राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या स्वाक्षरीचं पत्र राजभवनावर दुपारी देण्यात आलं. ते पत्र हाती येताच राज्यपालांनी त्यावर तातडीनं कार्यवाही केली. हे पत्र दिल्याची कसलीही माहिती काँग्रेसला नव्हती. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रवादीला दिलेली मुदत संपण्याआधीच राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं घटनाविरोधी असल्याचं ट्विट केलं. मात्र आता हे पत्र राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याची माहिती समोर आल्यामुळे काँग्रेस नेतेही बुचकळ्यात पडले आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार