शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

Maharashtra Government: विधानसभेत एकच चर्चा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 7:54 PM

निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बहुमत असतानाही मुख्यमंत्रिपदाच्या हट्टापायी भाजपा-शिवसेना एकत्र येऊ शकले नाहीत.

मुंबईः गेल्या अनेक दिवसांचा राज्यातला राजकीय पेच अखेर संपुष्टात आला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे. बहुमत सिद्ध करत असताना फडणवीसांनी तांत्रिक कारणं देत उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. परंतु तरीही न डगमगता उद्धव ठाकरेंनीसुद्धा आपल्या मितभाषी स्वभावानुसार कृतीतून नवा आदर्श निर्माण केला. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बहुमत असतानाही मुख्यमंत्रिपदाच्या हट्टापायी भाजपा-शिवसेना एकत्र येऊ शकले नाहीत. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्याचा कार्यक्रम सुरूच होता. तीन दशकांपासून जो पक्ष सोबत होता तो आता विरोधात आहे, तर ज्यांच्याशी निवडणुकीत संघर्ष केला त्यांच्याच सोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे विधानसभेत काय बोलतात आणि कोणती भूमिका घेतात, याचीच सगळ्यांना उत्कंठा लागली होती.विधानसभेत येण्याचा उद्धव यांचा पहिलाच दिवस असल्यानं भाजपा त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेणार असल्याची सगळ्यांनाच कल्पना होती. पण उद्धव ठाकरे कुठेही तोल ढळू न देता विधानसभेत थेट विरोधी बाकांवर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांजवळ गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली. तसेच त्यांच्या खांद्यावरही हात ठेवला, त्यामुळे विधानसभेत उपस्थित असलेल्या आमदारांचा भुवया उंचावल्या, सगळ्याच स्तरातून उद्धव ठाकरेंच्या या कृतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राहुल गांधी स्टाईल सभागृहात गाजली होती आणि त्याची जोरदार चर्चाही झाली. लोकसभेतही एकदा अनपेक्षितपणे राहुल गांधींनी भाषणानंतर मोदींच्या आसनाजवळ जात त्यांची गळाभेट घेतली होती. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. ती गळाभेट चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या गळाभेटीची चर्चा होत आहे. दरम्यान, सभागृहात झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले.  ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हते. सदस्य अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य जयंत पाटील, नवाब मलिक, सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले.  विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अबू आझमी, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मंत्रिमंडळावर सदस्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल मी आभार मानतो. तमाम जनतेचे आभार मानून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या समाजसुधारकांना आणि आई-वडिलांना स्मरण करीत महाराष्ट्र घडविण्याचे शपथ घेतली आहे. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.    

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस