शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Maharashtra Government: 'अब की बार, देवेंद्र फडणवीस पर वार'; सरकार पडताच खडसेंनी सोडला पहिला 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:05 PM

देवेंद्र सरकार पडताच खडसेंचा 'राग'; भाजपाला घरचा आहेर

मुंबई: देवेंद्र सरकार-२ कोसळताच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर २५ जागा वाढल्या असत्या, असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकीट कापल्यानं, त्यांना विश्वासात न घेतल्यानंच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचं खडसे अप्रत्यक्षपणे म्हणाले. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. माझ्यासह विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीट देण्यात आलं नाही. मात्र किमान आम्हाला सक्रीय केलं असतं, तरी पक्षाच्या २५ जागा वाढल्या असत्या, असं खडसे म्हणाले. पक्ष चुकत नसतो. ज्यांच्याकडे धुरा दिली जाते, त्यांचे निर्णय चुकत असतात, असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बहुमताची जुळवाजुळव करण्यात अपयश आल्यानं भाजपा सरकार कोसळलं. मला जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचं कारण काय, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मी पक्षासाठी ४२ वर्षे तपश्चर्या केली. पक्ष वाढावा यासाठी मेहनत घेतली. पण पक्षाच्या विस्तारासाठी खस्ता खाणाऱ्या नेत्यांनाच बाजूला करण्यात आलं, अशा शब्दांत खडसेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्यावर भाष्य केलं. सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे आम्ही त्याचवेळी रद्दीत विकले. कारण त्यावेळी रद्दीला चांगला भाव होता, असं म्हणत खडसेंनी अजित पवारांना सोबत घेणाऱ्या भाजपाच्या भूमिकेवर सूचक प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Khadaseएकनाथ खडसेVinod Tawdeविनोद तावडेPrakash Mehtaप्रकाश मेहताChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे