शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Maharashtra Government: …म्हणून भर विधानसभेतच अजितदादा जितेंद्र आव्हाडांवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 20:48 IST

विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे.

मुंबईः विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हते. सदस्य अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य जयंत पाटील, नवाब मलिक, सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. परंतु विश्वासदर्शक ठराव मांडत असताना अजित पवार हे जितेंद्र आव्हाडांवर संतापले आणि तोच चर्चेचा विषय ठरला आहे.त्याचं झालं असं की, विश्वासदर्शक ठरावावेळी प्रत्येक आमदाराच्या आसनाला ठरावीक अनुक्रमांक बहाल करण्यात येतो. त्याप्रमाणे विधानसभेतल्या प्रत्येक सदस्यानं विश्वासदर्शक ठरावावर मतदान करायचं असतं. विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देण्यासाठी जागेवर उभं राहून आपलं नाव सांगत अनुक्रमांकाचा उल्लेख करावा लागतो. परंतु नाव आणि अनुक्रमांकाचा उल्लेख करताना बऱ्याचदा आमदारांनी गफलत होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडसुद्धा अशाच प्रकारे गोंधळून गेल्याचं पाहायला मिळाले.मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर ती गणती वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत आली. त्यांनी आपला अनुक्रमांक 14 सांगत स्वतःचं नाव सांगितलं. त्यानंतर अॅड. के. सी. पाडवींनीसुद्धा स्वतःचा अनुक्रमांक 15 सांगत नाव सांगितले. जितेंद्र आव्हाडांचा नंबर आल्यानंतर त्यांची गल्लत झाली. जितेंद्र आव्हाडांनी आपलं नाव सांगत अनुक्रमांक 16 ऐवजी थेट 20 सांगितला. त्यानंतर सगळेच आश्चर्यचकीत झाले. हा प्रकार अजितदादांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच आव्हाडांना तुमचा क्रमांक 20 नसून 16 आहे, असं सांगितलं.अजितदादांनी रागाच्या भरातच आव्हाडांना सर्वांसमक्ष सुनावले. आव्हाडांच्या शेजारी बसलेल्या हसन मुश्रीफांनीसुद्धा ही चूक आव्हाडांच्या ध्यानात आणून दिली. तसाच काहीसा प्रकार आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबाबतही झालेला पाहायला मिळाला. त्यांना 100 अनुक्रमांक देण्यात आल्यानंतरही त्यांनी 78 असा उच्चारला. ही चूक लागलीच त्यांच्या शेजारी बसलेल्या आमदारांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. पण आदित्य ठाकरे यांनी बहुमत चाचणीदरम्यान आपल्या नावाचा उल्लेख करताना आदित्य रश्मी उद्धव ठाकरे असं म्हटलं, तर अनुक्रमांक 25 असल्याचं नमूद केलं.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019