शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
2
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
3
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
4
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
5
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
6
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
7
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
8
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
9
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
10
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
11
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
12
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
13
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
14
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
15
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
17
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
18
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
19
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
20
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...त्यामुळे देवेंद्र फडणवीस ठरणार महाराष्ट्राचे 'विराट कोहली'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 17:55 IST

Maharashtra elections 2019 महाराष्ट्राचा विराट कोहली म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहता येईल. त्यांनी निवडणुकीत विरोधकांना वर उठूच दिले नाही

- विनायक पात्रुडकरसध्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारतीय दौऱ्यावर आहे आणि भारतीय क्रिकेट संघाने त्यांची पुरती दाणादाण उडवून ‘व्हाईटवॉश’ दिला आहे. तीनही कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या भारतीय संघाने विजय मिळवला. या मालिकेत कोहली आत्मविश्वासाने मैदानावर उतरला. ‘ तो आला, त्याने पाहिले आणि तो जिंकला’ अशा आविर्भावात विराट कोहली खेळला आणि नावाजलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ पुरता घायकुतीला आला. पाहुण्यांनी भारतीय संघापुढे अक्षरश: नांगी टाकली. तसाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसतो आहे. कालच्या एक्झिट पोल मधून ज्यापद्धतीने युतीच्या पारड्यामध्ये वजन टाकले गेलेले आहे. २०० च्या वर जागा मिळणार अशी भविष्यवाणी केली गेली आहे, ती लक्षात घेता महाराष्ट्राचा विराट कोहली म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहता येईल. त्यांनी विरोधकांना वर उठूच दिले नाही, आणि ज्या वेगाने त्यांनी सगळी निवडणूक काबीज केली, प्रचंड सभा घेतल्या, जागोजागी पदयात्रा काढल्या, महाजनादेश यात्रा काढली, शिवाय माध्यमांनाही त्यांनी हाताशी धरले या सगळ्याचा प्रभाव हा त्यांच्या एक्झिट पोलवरुन दिसतो आहे. आणि अर्थातच नांगी टाकलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आणि आत्ता महाराष्ट्रात नांगी टाकलेले विरोध पक्ष यांची गुणवत्ता जवळपास सारखी म्हणता येईल.

शरद पवार आणि काहीप्रमाणात राज ठाकरे वगळता कोणताही दमदार विरोधक हा महाराष्ट्र सरकारपुढे दिसला नाही. त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील असो, स्वत: मुख्यमंत्री असो किंवा शिवसेनेचे नेते असो यांनी जो २०० चा आकडा सांगितला होता तो सहज पार करु शकतील असे चित्र विरोधकांनीच निर्माण करुन दिलेले आहे. कारण या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्ष पूर्ण ढेपाळलेला दिसत होता. राहुल गांधीच्या एक-दोन सभा आणि मनमोहनसिंग यांची एक पत्रकार परिषद वगळता दिल्लीतील कोणताही नेता महाराष्ट्राकडे फारसा फिरकला नाही. त्याचप्रमाणे कॉंग्रेसकडे तसे नेतृत्त्व दिसलेच नाही. सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी येतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनीही महाराष्ट्राचा दौरा केला नाही. या सगळ्याचा परिणाम कॉंग्रेसच्या एकूण नेतृत्वावर आणि कारकिर्दीवर झाला. कॉंग्रेसचे कार्यकर्ते हे फारसे उत्साही दिसत नव्हते. किंबहुना मनाने पराभव स्वीकारला की काय अशी परिस्थिती कॉंग्रेसच्या मंडळींमध्ये होती. त्या तुलनेने त्यांच्याशी आघाडी केलेल्या राष्ट्रवादी पक्षाने मात्र बऱ्यापैकी आक्रमकपणे ही निवडणूक लढविली. स्वत: शरद पवारांनी ७९ व्या वर्षी ज्या तडफेने आणि भरपावसात सभा घेतल्या तो निश्चितच राजकीय पक्षांच्या चर्चेचा विषय ठरला, किंबहुना ते एक प्रभावी माध्यम ठरले. यासगळ्या निवडणुकीमध्ये शरद पवारांची पावसातील सभा जशी गाजली तशीच राज ठाकरेंची पावसामुळे रद्द झालेली सभादेखील गाजली. त्यामुळे उशीरा जागे झालेले राज ठाकरे इलेक्ट्रानिक माध्यमामुळे घराघरात पोहचले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता.
राज ठाकरेंच्या मनसे पक्षाने १०१ जागा लढविल्या. परंतु राज ठाकरेंनी आधीपासून व्यवस्थित नियोजन करुन निवडणूक लढविली असती तर किमान १० त १५ जागा त्यांच्या पदरात पडल्या असत्या हे आत्ताच्या वातावरणावरुन लक्षात येईल. परंतु राज ठाकरे खूप उशीरा मैदानात उतरले. त्यांनी अगदी मोजक्या सभा घेतल्या. त्यामुळे त्यांचे उमेदवार केवळ मते खाण्यासाठीच उभे राहिलेत की काय अशी शंका नंतर निर्माण झाली. अर्थात एक - दोन जागांवर त्यांची टफ फाईट होतीच. परंतु तो फारसा चर्चेचा विषय राहणार नाही. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी वा मनसे असो हे तुलनेने युतीच्या वादळापुढे, युतीच्या प्रचारापुढे, युतीच्या झंझावातापुढे फिके पडले असे चित्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत निर्माण झाले. आणि त्याचाच परिणाम म्हणून युती आरामात २०० ची आघाडी गाठू शकते, असे चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसते आहे. त्यामुळे एक्झिट पोल तुलनेने आत्ता तरी खरा दिसतो आहे. अर्थात याचा प्रत्यक्ष निकाल वा वस्तुस्थिती २४ तारखेच्या निकालामध्ये कळेलच.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसIndia vs South Africaभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना